शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सी-लेजची कामे पाहून संशोधक पथक समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘विज्ञान तंत्रज्ञान आधाराने परिसरात समृद्धि आणणे’ या व्यापक उद्देशाने गेले दोन वर्ष विविध अभ्यास, तज्ञांचा प्रवास, चर्चासत्र, कार्यक्रम-उपक्रम खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अधिक गतीने राबवण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सी-लेज अंतर्गत ही कामे सुरू असल्याची माहिती मुंबई येथील संशोधन पथकाला देण्यात आली.स्थानीय संस्थांचे विकासातील अनुभव, विद्यापीठात तयार होणाऱ्या संशोधनाची जोड व राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे आर्थिक पाठबळ अशा त्रिवेणी संयोगातून सीलेज प्रकल्पाची तपासणी सध्या नंदुरबार जिल्ह्यात केली जात आहे. विविध अभ्यासक, संशोधकांचा प्रवास या निमित्ताने जिल्ह्यात घडणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.बी.जोशी यांचे नेतृत्वात एका चमुने जिल्ह्यात भेट दिली.कृषि विज्ञान केंद्रात डॉ.गजानन डांगे यांनी या अभ्यास गटासमोर नंदुरबार जिल्ह्यातील विकास विषयक सद्यस्थिती, आव्हाने आणि विज्ञान तंत्रज्ञान आधारित आगामी दिशा याबाबत विस्तृत मांडणी केली. जिल्ह्यातील उद्योग उभारणी यासंदर्भात नवउद्योजक यशपाल पटेल, पाचोराबारी यांनी देखील आपले अनुभव मांडले. याप्रसंगी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, सचिव डॉ.नितिन पंचभाई तसेच नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल चे सदस्य उपस्थित होते.कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या प्रयोगाची अत्यंत तपशीलासह माहिती केंद्रातील विषय तज्ञांनी दिली. डॉ.हेडगेवार सेवा समिती मार्फत गेली १२ वर्ष खांडबारा, नवापूर परिसरातील स्थलांतर थांबवणे, रोजगार निर्मिती याबाबत कार्य सुरू आहे. देशभरातील अभ्यासक या परिसरास अलीकडे भेटी देत आहेत. मुंबई येथील अभ्यासचमुने रविवारी खांडबारा परिसरातील विविध गावांना, उद्योजक शेतकरी युवकांच्या भेटी घेतल्या. शासन, संस्था आणि समाज यांच्या बांधणीतून सुरू असलेल्या या प्रयोगतील यश पाहून अभ्यास चमुने समाधान व्यक्त केले.कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहतोंडे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या 'मिरची उद्योगातील तंत्रज्ञान विषयक आवश्यकता' याबाबत तज्ञांशी सविस्तर चर्चा केली. चमुने थेट मिरचीच्या पथारीला भेटी दिल्या व तेथे मिरची उद्योजकांचे प्रतिनीधी राठी बंधु यांचेशी संवाद साधला.मुंबई येथील १२ प्राध्यापक व २४ संशोधक युवकांनी जिल्ह्यात या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी केली. त्यांच्यासोबत विद्यापीठाचे विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी सी-लेजची माहिती दिली.४मिरची पथारीवर जावून तेथील कामांचा आढावा देखील त्यांनी घेतला. कृषी विज्ञान केंद्रात देखील त्यांनी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, संशोधन प्रकल्पांची आणि इतर बाबींची माहिती जाणून घेतली. सायंकाळी हे पथक मुंबईकडे रवाना झाले.