शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग येत्या 20 नोव्हेंबर्पयत दुरुस्त न झाल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून याबाबत त्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आह़े     तळोदा आणि अक्कलकुवा या दोन शहरांच्या दरम्यान शेवाळी ते नेत्रंग आणि ब:हाणपूर-अंकलेश्वर असे दोन महामार्ग आहेत़ दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट गेल्या पाच वर्षापासून घातला जात आह़े दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आले असल्याने जुन्या मार्गाची डागडुजी करण्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकार संपुष्टात आल्याची माहिती आह़े यातून गेल्या दोन वर्षात मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे रुंदावून गंभीर स्थिती निर्माण झाली आह़े हा रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर नागरिक अक्कलकुवा येथून नंदुरबार जिल्ह्यातून जाण्यासाठी गुजरात राज्यातील रस्त्यांचा वापर करत आहेत़ यातून वर्दळ कमी झाली असली तरी गुजरात राज्यातून जादा अंतर कापावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरु आहेत़ यात सर्वाधिक हाल शासकीय कर्मचा:यांचे होत असून त्यांना जादाचे अंतर सक्तीने कापावे लागत आह़े दरम्यान बुधवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांच्यासह अक्कलकुवा शहर आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत माहिती दिली़ यावेळी त्यांनी निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आह़े महामार्ग हस्तांतर झाले असल्याने त्याचे कार्यालय नेमके, कुठे आहे, याची माहिती नसल्याने दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला़ अक्कलकुवा, सोरापाडा ते वाण्याविहिर फाटा यादरम्यान दोन फूट खोल आणि सात ते आठ फूट लांबीचे खड्डे पडल्याने अपघात सुरु असल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होत़े  

अक्कलकुवा शहरातून गुजरातकडे मार्गस्थ होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सोरापाडा येथील वरखेडी नदीच्या पुलाचीही गंभीर अवस्था आह़े पुलावरील डांबरीकरण पाच वर्षापूर्वीच उखडले होत़े तर यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे कठडेही वाहून गेले आहेत़ अरुंद अशा या पुलावरुन दिवसभरात शेकडो अवजड वाहने गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश करतात़ कठडे नसलेल्या पुलावरुन पायी चालणा:यांची वर्दळ असत़े रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने अवजड वाहन थेट पुलावरुन खाली कोसळण्याची भिती असल्याने पुलाची दुरुस्ती ही सर्वाधिक गरजेची असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महामार्गवर गुलीउंबर्पयतच्या महाराष्ट्र हद्दीर्पयत रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात वाहने फसून वाहतूकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सोडवण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सातत्याने मदत करुन मोलाची भूमिका बजावत होत़े पोलीस वाहनातून दगड आणून भराव करुन वाहने काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला गेला होता़ बुधवारी शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची भेट घेत त्यांच्याजवळ महामार्ग दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता़ परंतू जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यांनी नागरिकांना शांत करुन आंदोलन करण्याबाबत समज दिली होती़ त्यानंतर नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिल़े 20 नोव्हेंबर्पयत जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यानंतरही रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आह़े