शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग येत्या 20 नोव्हेंबर्पयत दुरुस्त न झाल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून याबाबत त्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आह़े     तळोदा आणि अक्कलकुवा या दोन शहरांच्या दरम्यान शेवाळी ते नेत्रंग आणि ब:हाणपूर-अंकलेश्वर असे दोन महामार्ग आहेत़ दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट गेल्या पाच वर्षापासून घातला जात आह़े दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आले असल्याने जुन्या मार्गाची डागडुजी करण्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकार संपुष्टात आल्याची माहिती आह़े यातून गेल्या दोन वर्षात मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे रुंदावून गंभीर स्थिती निर्माण झाली आह़े हा रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर नागरिक अक्कलकुवा येथून नंदुरबार जिल्ह्यातून जाण्यासाठी गुजरात राज्यातील रस्त्यांचा वापर करत आहेत़ यातून वर्दळ कमी झाली असली तरी गुजरात राज्यातून जादा अंतर कापावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरु आहेत़ यात सर्वाधिक हाल शासकीय कर्मचा:यांचे होत असून त्यांना जादाचे अंतर सक्तीने कापावे लागत आह़े दरम्यान बुधवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांच्यासह अक्कलकुवा शहर आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत माहिती दिली़ यावेळी त्यांनी निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी केली आह़े महामार्ग हस्तांतर झाले असल्याने त्याचे कार्यालय नेमके, कुठे आहे, याची माहिती नसल्याने दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला़ अक्कलकुवा, सोरापाडा ते वाण्याविहिर फाटा यादरम्यान दोन फूट खोल आणि सात ते आठ फूट लांबीचे खड्डे पडल्याने अपघात सुरु असल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होत़े  

अक्कलकुवा शहरातून गुजरातकडे मार्गस्थ होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सोरापाडा येथील वरखेडी नदीच्या पुलाचीही गंभीर अवस्था आह़े पुलावरील डांबरीकरण पाच वर्षापूर्वीच उखडले होत़े तर यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे कठडेही वाहून गेले आहेत़ अरुंद अशा या पुलावरुन दिवसभरात शेकडो अवजड वाहने गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश करतात़ कठडे नसलेल्या पुलावरुन पायी चालणा:यांची वर्दळ असत़े रात्रीच्यावेळी अंदाज न आल्याने अवजड वाहन थेट पुलावरुन खाली कोसळण्याची भिती असल्याने पुलाची दुरुस्ती ही सर्वाधिक गरजेची असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महामार्गवर गुलीउंबर्पयतच्या महाराष्ट्र हद्दीर्पयत रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात वाहने फसून वाहतूकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सोडवण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सातत्याने मदत करुन मोलाची भूमिका बजावत होत़े पोलीस वाहनातून दगड आणून भराव करुन वाहने काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला गेला होता़ बुधवारी शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांची भेट घेत त्यांच्याजवळ महामार्ग दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता़ परंतू जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यांनी नागरिकांना शांत करुन आंदोलन करण्याबाबत समज दिली होती़ त्यानंतर नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिल़े 20 नोव्हेंबर्पयत जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने त्यानंतरही रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आह़े