शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

अतिदुर्गम भागात आमदारांनी पायपीट करीत समस्या जाणून घेतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:27 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागझिरी, उमरापाणी, कोटबांधणी या गावांना  भेट देत आमदार राजेश पाडवी यांनी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागझिरी, उमरापाणी, कोटबांधणी या गावांना  भेट देत आमदार राजेश पाडवी यांनी तेथील गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी काही महिन्यात या सर्व गावांना रस्ते व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.           सातपुडा पर्वतरांगेत अनेक गाव-पाडे अतिदुर्गम भागात मोडतात. गेल्या   अनेक वर्षांपासून येथील गावकरी    प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र निवडणूक संपली की उमेदवारांनी दिलेले आश्वासन हवेत अदृश्य होतात हा येथील गावकऱ्यांचा नेहमीचा अनुभव आहे. आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघात संपर्क अभियान राबविले असून प्रत्येक आठवड्यात अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम सुरू आहे.  आमदार पाडवी यांनी सांगितले की, प्रत्येक पाड्यापर्यंत रस्ते तयार करण्यात येतील, वीजपुरवठाही लवकर आपल्यापर्यंत पोहोचवू व पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहिरी बनवून   देण्यात येतील. रेशनकार्ड, शासनाच्या विविध लाभाच्या योजनांतर्गत विधवा महिलांना पगार, घरकूल, वृध्दांचा     पगार यासाठी कोणालाही अडचणी    येत असतील तर माझ्याशी संपर्क साधावा. वनपट्ट्यांचा प्रश्नही मार्गी लावणार असून प्रलंबित असलेले दावे लवकरच निकाली काढू, असे सांगितले.                   या वेळी काँग्रेस पक्षात २० वर्षापासून काम करणारे पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर पावरा व उपलापाणीचे कारभारी नोबल्या वळवी यांच्यासह कार्यकर्ते व महिलांनी भाजपमधे प्रवेश केला.  या वेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, अदिवासी मोर्चाचे जिल्हा सचिव नारायण ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉ.विजय चौधरी, अदिवासी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुखलाल रावताळे, माजी सरपंच शंकर पावरा, कारभारी नोबल्या वळवी, कोटबांधणीचे जगन मोरे, वीरसिंग पाडवी, गुड्डू वळवी, गोपी पावरा, बाबूलाल पावरा, कांतीलाल पाडवी, गुलाबसिंग भिल, आट्या भिल, दाज्या भिल, रतिलाल भिल,   कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्या भेटीला आलेले पहिले आमदार...देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या समस्यांबाबत चर्चा केली नव्हती. आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्येक पाड्यावर पायपीट करून गावकऱ्यांच्या  घरी जाऊन चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. आम्ही प्रत्येक निवडणुकीत आमच्या मतदानाचा हक्क बजावतो. मात्र आजपर्यंत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, जि.प. सदस्य आमच्या भेटीला आले नाही. आपण पहिले आमदार आहात की जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडल्यानंतर आमच्या घरापर्यंत पोहोचले, अशा शब्दात गावकर्‍यांनी आमदार पाडवी यांच्याजवळ भावना या वेळी व्यक्त केल्या.