शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेत शिवारातील विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आतापासूनच उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.तालुक्यातील अलखेड, पाडळदा या शिवारातील विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. सद्य:स्थितीत पाणी पातळी खालावली असली तरी खरीप हंगामात किमान सोयाबीनचे उत्पन्न तरी घेता यावे यासाठी परिसरातील शेतकºयांकडून पाणी मिळवण्यासाठी सबमर्सिबल मोटर खाली उतरविणे, जळालेली सबमर्सिबल दुरूस्त करणे व नवीन बसविणे यासारख्या विविध उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सुमारे ७०० फुट बोअरिंग करूनही पाणी लागत नसल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.येत्या काळात भूजल पातळी वाढावी म्हणून परिसरातील शेतातील पाणी शेतातच जिरविणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करीत लघु बंधारे बांधून पाणी अडविणे यासारख्या कामांना भर देणे गरजेचे आहे. तालुक्यात बºयाच ठिकाणी मनरेगाची कामे सुरु आहेत़ यातून काहीअंशी लाभ मिळण्याची शक्यता आहे़ तालुक्यात अनेक तलावांचा गाळ काढणे सुरु असल्याने भूजन वाढणार आहे़ असे असले तरी परिसरातील शेतकºयांकडून ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे.शेतात वापरल्या जाणाºया ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होत असल्याने कमी पाण्यात देखील विविध पिकांचे उत्पादन घेता येणार आहे़ तसेच ठिबक सिंचनासाठी शासनाच्यावतीने अनुदानही देण्यात येते.