शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

धर्म म्हणजे कर्तव्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 20:37 IST

धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या ...

धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या भागवतकार रमेश गणेश शास्त्री उर्फ बापू शास्त्री सांगतात.भागवतकार बापू शास्त्री यांनी आतापर्यंत ३५८ भागवत पारायणे पूर्ण केली केली आहेत. बापू शास्त्री बी.ए.बी.एड. असून ३० वर्षे त्यांनी शहादा तालुका को-आॅपरेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शेठ व्ही.के. शाह विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले. बापू शास्त्री यांचे वडील भागवतकार असल्याने तसेच घरी भागवतकार, प्रवचनकार यांचा सतत संपर्क असल्याने लहानपणापासूनच पोथी वाचण्याची आवड निर्माण झाली. घरात धार्मिक वातावरण, संभाषण संस्कृतमधूनच होत असल्याने बापू भागवत कथेकडे वळले. मंदिरातच राहत असल्याने वडिलांच्या अनुपस्थितीत चातुर्मासात बापू भागवत कथा सांगत. अगदी लहानपणापासूनच बापू भागवत करत असल्याने भागवत कथेवर त्यांची पकड बसल्याने डोंबिवली, पुणे, मालेगाव, कल्याण या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी ठिकाणी त्यांचे भागवत झाले आहेत. १९६८ पासून ते आतापर्यंत त्यांनी ३५८ भागवत कथा भागवत केल्या असून भागवत कथा सांगायची एकसष्टी त्यांनी पूर्ण केली आहे. अनेकदा भागवताचे उत्पन्न ते समाजासाठी अर्पण करत असतात. मातोश्री वृद्धाश्रम, वनवासी कल्याण आश्रम यांच्यासाठी त्यांनी भागवत कथा केल्या आहेत. त्याचप्रमाणे बालाजी मंदिर शहादा व दत्त मंदिर तळेगाव यांच्या उभारणीसाठीदेखील त्यांनी भागवत केले आहे. बापूंच्या १३ पिढ्यांपासून भागवत कथा सांगण्याची परंपरा सुरू आहे. धर्म म्हणजे माणसाच्या जीवनातील कर्तव्य अशी साधी, सोपी व सरळ व्याख्या ते करतात. प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म होय. पुत्रधर्म, शेजारधर्म, पतीधर्म हा खरा धर्म. समाज व देशाप्रती असलेले कर्तव्य म्हणजे धर्म असे ते सांगतात. पूजापाठ ही उपासना पद्धत आहे, देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे. कर्तव्य पार पाडणे हीच खरी धर्माची शिकवण असल्याने या धर्माचे पालन महत्त्वाचे असल्याचे बापू शास्त्री आवर्जून सांगतात. भागवत केल्याने आपल्याला आनंद मिळतो, समाज प्रबोधन करता येते आणि म्हणून वयाची ८१ वर्षे होऊनही बापूंचे भागवत कथा प्रवचन सुरू आहेत. बापू अतिशय सोप्या भाषेत व शब्दात भागवत कथा सांगत असल्याने बापूंचे भागवत कथा ऐकण्यात भाविक रमून जातात.-सुनील सोमवंशी, शहादा