शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

धर्म म्हणजे कर्तव्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 20:37 IST

धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या ...

धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या भागवतकार रमेश गणेश शास्त्री उर्फ बापू शास्त्री सांगतात.भागवतकार बापू शास्त्री यांनी आतापर्यंत ३५८ भागवत पारायणे पूर्ण केली केली आहेत. बापू शास्त्री बी.ए.बी.एड. असून ३० वर्षे त्यांनी शहादा तालुका को-आॅपरेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शेठ व्ही.के. शाह विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले. बापू शास्त्री यांचे वडील भागवतकार असल्याने तसेच घरी भागवतकार, प्रवचनकार यांचा सतत संपर्क असल्याने लहानपणापासूनच पोथी वाचण्याची आवड निर्माण झाली. घरात धार्मिक वातावरण, संभाषण संस्कृतमधूनच होत असल्याने बापू भागवत कथेकडे वळले. मंदिरातच राहत असल्याने वडिलांच्या अनुपस्थितीत चातुर्मासात बापू भागवत कथा सांगत. अगदी लहानपणापासूनच बापू भागवत करत असल्याने भागवत कथेवर त्यांची पकड बसल्याने डोंबिवली, पुणे, मालेगाव, कल्याण या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी ठिकाणी त्यांचे भागवत झाले आहेत. १९६८ पासून ते आतापर्यंत त्यांनी ३५८ भागवत कथा भागवत केल्या असून भागवत कथा सांगायची एकसष्टी त्यांनी पूर्ण केली आहे. अनेकदा भागवताचे उत्पन्न ते समाजासाठी अर्पण करत असतात. मातोश्री वृद्धाश्रम, वनवासी कल्याण आश्रम यांच्यासाठी त्यांनी भागवत कथा केल्या आहेत. त्याचप्रमाणे बालाजी मंदिर शहादा व दत्त मंदिर तळेगाव यांच्या उभारणीसाठीदेखील त्यांनी भागवत केले आहे. बापूंच्या १३ पिढ्यांपासून भागवत कथा सांगण्याची परंपरा सुरू आहे. धर्म म्हणजे माणसाच्या जीवनातील कर्तव्य अशी साधी, सोपी व सरळ व्याख्या ते करतात. प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म होय. पुत्रधर्म, शेजारधर्म, पतीधर्म हा खरा धर्म. समाज व देशाप्रती असलेले कर्तव्य म्हणजे धर्म असे ते सांगतात. पूजापाठ ही उपासना पद्धत आहे, देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे. कर्तव्य पार पाडणे हीच खरी धर्माची शिकवण असल्याने या धर्माचे पालन महत्त्वाचे असल्याचे बापू शास्त्री आवर्जून सांगतात. भागवत केल्याने आपल्याला आनंद मिळतो, समाज प्रबोधन करता येते आणि म्हणून वयाची ८१ वर्षे होऊनही बापूंचे भागवत कथा प्रवचन सुरू आहेत. बापू अतिशय सोप्या भाषेत व शब्दात भागवत कथा सांगत असल्याने बापूंचे भागवत कथा ऐकण्यात भाविक रमून जातात.-सुनील सोमवंशी, शहादा