शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
3
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
4
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
5
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
6
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
7
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
8
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
9
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
10
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
11
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
12
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
13
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
14
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
15
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
16
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
17
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
18
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
19
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
20
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

खैरवे धरणातून नेसू नदीत पाण्याचे आवर्तन सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

नवापूर तालुक्यातील पाच ते सहा गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी काही भागात महिलांना भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या ...

नवापूर तालुक्यातील पाच ते सहा गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी काही भागात महिलांना भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचीही परिस्थिती अवघड आहे. पशुधन कसे वाचवावे, हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. दैनंदिन वापरासाठी मोठी अडचण भासू लागली आहे. बागायती भागातील विहिरी, विंधन विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. जिरायती भागात पाण्याची अडचण आहे. नवापूर तालुक्यातील अनेक गावातील पीकही करपू लागले आहे. खैरवे धरणातून पाणी सोडल्याने अनेक विहिरी बोअरवेल हातपंप यांचा पाणीसाठा वाढतो. आदिवासी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतो.

या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून खैरवे धरणातून ताबडतोब पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे व नागरिकांना पिण्याचे पाणी तत्काळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्काळ निर्णय घेऊन पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करावे

खैरवे धरणातून ताबडतोब पाणी सोडावे शेतकरी, ग्रामस्थ, महिला पाण्यापासून वंचित आहेत. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवापूर तालुक्यातील देवमोगरा, निजामपूर, पालीपाडा, शेही शेती, बहुतांश गावे ही खैरवे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणातून पाणी सोडावे, यासाठी दरवर्षी निवेदन द्यावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पाहून तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करावे.

- महेंद्र वळवी, सामाजिक कार्यकर्ते, शेही