शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

गाळमुक्त धरण योजनेचा अमोनी येथून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:48 IST

दुष्काळमुक्तीसाठी उपक्रमात सहभागाचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : गाळमुक्त धरण अथवा तलाव योजनेंतर्गत तालुक्यातील अमोनी येथील तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ रविवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जास्तीत जास्त लोकांनी दुष्काळ मुक्तीसाठी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख अतिथींनी केले.संपूर्ण दुष्काळ मुक्तीसाठी राज्य शासनाने यंदापासून जलयुक्त धरण व तलाव ही योजना हाती घेतली आहे. या योजना शासनाच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी या विभागाला निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील पाच गावांचा या योजनेत समावेश कर ण्यात आला आहे. त्यात अमोनी, पाडळपूर, गडीकोठडा, तळवे व बोरद या गावांचा समावेश आहे. त्यापैकी अमोनी येथील गावाजवळील तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.जी. ठाकरे, सरपंच चंदन पाडवी, जनसेवक योगेश पाटील, उपसरपंच दिलीप पावरा, रेवानगरचे उपसरपंच दाज्या पावरा, अनुलोम उपविभाग प्रमुख कल्पेश पाडवी, तलाठी डी.बी. हाडे, ग्रामसेवक राजेंद्र पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अमादार पाडवी व जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संपूर्ण दुष्काळ मुक्ती व पाणी टंचाईवर कायम मातस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने यंदापासून ही योजना हाती घेतली आहे. त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रय} करण्याचे आवाहन केले. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी यांनी लोकसहभागातून या कामासाठी 50 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासनदेखील दिले. स्वत: त्यांनी दहा हजाराची मदत देखील लगेच केली. गावातील तलाव व धरणात मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ आता काढला जाणार असल्यामुळे गावक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी या योजनेत जास्तीत जास्त गावे प्रशासनाने समाविष्ट करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.