शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

पुनर्वसन वसाहतींना यावर्षीही पूरस्थितीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यात गेल्यावर्षी विस्थापितांच्या तिन्ही वसाहतींसह इतर तीन गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरून घरांचे मोठ्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यात गेल्यावर्षी विस्थापितांच्या तिन्ही वसाहतींसह इतर तीन गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संबंधीत ग्रामपंचायतींनी अथवा प्रशासनाने यातून कुठलाच धडा घेतला नाही. कारण अगदी पावसाळा तोंडावर आला असतांना गावाजवळील नद्या-नाल्यांचे खोलीकरण करण्यात आलेले नाही. संबंधीतांनी या कामांना खो दिल्यामुळे यंदाही गावकऱ्यांना पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी दखल घेऊन सक्त ताकीद द्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या रोझवा पुनर्वसन, रेवानगर, मोड या वसाहतींबरोबरच भवर, शिर्वे व रापापूर चौगाव अशा सहा गावांमध्ये नदी-नाल्यांचे पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नदी काठावरील शेकडो घरांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर या रहिवाशांचा संसार उघड्यावर आला होता. मोड पुनर्वसन वसाहतीत तर सर्वांचेच नुकसान झाले होते. शासनाने या नुकसान ग्रस्तांना तुटपुंजी मदत केली असली तरी गावकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे घेऊन आपला संसार जसा-तसा पुन्हा उभा केला आहे.गेल्या वर्षी नद्या नाल्यांची ही पूर परिस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी संबंधीत गावाच्या पंचायतींनी अथवा यंत्रणांनी निदान गावाजवळ तरी नदी नाल्यांचे खोलीकरण करणे अपेक्षित असतांना या कामांना कोणीच प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. कारण यंदाचा पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. तरीही कुणीही याबाबत गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. साहजिकच यंदाही संबंधित गावातील रहिवाशांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.वास्तविक नैसर्गिक आपत्ती निवारण्याच्या बैठकीत तरी नाला खोलीकरणाचा हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता. मात्र त्यावर चर्चा झाली नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच संबंधीत यंत्रणांनीदेखील या कामांना गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप आहे. या बाबत प्रशासनास विचारले असता ही कामे करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती अथवा कृषी विभागाची आहे. त्याच्यासाठी निधीचीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पावसाळ्यापूर्वीची ही कामे युद्धपातळीवर करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा होती. शिवाय गेल्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात नदी-नाल्यांचे खोलीकरण व त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या होत्या. पावसाळा तोंडावर आला असतांना खोलीकरणाबाबत यंत्रणांनी कानावर हात ठेवला आहे. पुन्हा नुकसानीची वाट पाहणार आहेत का? असा प्रश्नही रहिवाशांनी केला आहे. निदान वरिष्ठ महसूल प्रशासनाने तरी याप्रकरणी चौकशी करून संबंधीतांना उपाययोजना करण्याबाबत तंबी द्यावी, अशी मागणी आहे.तळोदा नगरपालिकेने यंदाचा पावसाळा लक्षात घेऊन गेल्या १५ दिवसांपासून खर्डी नदीच्या खोलीकरणाच्या कामाबरोबरच मोठ्या गटारींच्या साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण थोडासा जरी मुसळधार पाऊस झाला तरी कॉलेज रस्ता, मेनरोड, बसस्थानक परिसरातील गटारींचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरले होते. शिवाय नवीन वसाहतींमध्येदेखील पाणी तुंबत होते. कारण दरवर्षी पावसाळ्यात व्यावसायिकांबरोबरच वसाहतधारकांची मोठी डोकेदुखी ठरत होती. विशेषत: पालिकेने खर्डीनदीवरील पुलाचे अतिक्रमण काढल्यामुळे विद्यानगरी व आदिवासी हाट्यांमधील पाणी शिरण्याचा प्रश्न दूर झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या या कामाबाबत तळोदा शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.