शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

न्यायालयाचे काम अद्यापही पूर्णपणे मराठीत नसल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

नंदुरबार : न्यायलयीन कामकाज अद्यापही पूर्णपणे मराठीतून सुरू होऊ शकले नसल्याची खंत मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली. याबाबतचा अध्यादेश दोन ...

नंदुरबार : न्यायलयीन कामकाज अद्यापही पूर्णपणे मराठीतून सुरू होऊ शकले नसल्याची खंत मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली. याबाबतचा अध्यादेश दोन दशकांपूर्वी काढण्यात आलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे निकालही मराठी भाषेतून मिळू लागल्याने त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब म्हणाावी लागेल.

न्यायालयाचे बहुतांश कामकाज पूर्वी इंग्रजीत चालत होते. निवाडेही इंग्रजीतूनच दिले जात होते. त्यामुळे सामान्य पक्षकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता दोन दशकांपूर्वी न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. सुरुवातीलाच त्याची अंमलबजावणी फारच कमी होती. नंतर मात्र ती वाढली. आता देखील बऱ्यापैकी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी काही बाबींमध्ये इंग्रजीचा अंतर्भाव असतोच. त्यामुळे पक्षकारांना काही प्रमाणात अडचणी येतात. त्यात आणखी सुधारणा व्हावी व गती यावी, अशी अपेक्षा मराठी भाषाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकालदेखील मराठीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे अंतिम निवाड्यांमध्ये ग्राह्य धरले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे त्या त्या मातृभाषेतून वाचायला मिळावे यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आग्रही होते. त्यांनी २०१७ मध्येच सर्वोच्च न्यायालयाला याबाबत सुचविले होते. त्यामुळे आता कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ते सोयीचे तर ठरतच आहे, शिवाय निकालांमधील अनेक बाबी समजण्यास आणि शिकण्यास देखील मिळू लागल्या आहेत.

आता न्यायालयांमधील कामकाज पूर्णपणे मराठीतून झाले तर त्यात आणखी भर पडणार आहे, अशी अपेक्षा अनेक विधीतज्ज्ञांनी आणि मराठी भाषा प्रेमींनीदेखील व्यक्त केली आहे.

कोट....

मराठीतून न्याय निवाडा व्हावा यासाठी उच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. बहुतांशी त्याचे पालनही होत आहे. लॅाकडाऊनच्या कालावधीत त्यात काही प्रमाणात खंड पडला होता. सद्याही युक्तिवाद व इतर बाबी या मराठीतूनच होत आहेत. इतर कामकाजात देखील मराठीची भर पडावी अशी अपेक्षा आहे. -ॲड.राजेश कुलकर्णी, विधीतज्ज्ञ, शहादा.