शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन मालाला पायबंद घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदी कालावधीत अनेकांचा रोजगार गेला. त्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आधार म्हणून शासनाकडून मोफत ...

शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदी कालावधीत अनेकांचा रोजगार गेला. त्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आधार म्हणून शासनाकडून मोफत रेशनचा पुरवठा केला गेला. परंतु, त्या गरिबांच्या तोंडातील घास काही महाभागांकडून हिरावला जात असून, चोरट्या मार्गाने परस्पर मालची विक्री होत असल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात शहादा पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा रेशनचा एक हजार १४८ किलो तांदूळ पकडला. विशेषतः ग्रामीण भागात अशा घटना घडत असतात. त्यावर पायबंद घालणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या पाहता, १ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. अर्थात सध्या रुग्णसंख्या कमी झाली आहे. संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता पाहता, राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना एक महिन्याचे धान्य मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना आधार मिळाला. शासनाकडून मिळालेले धान्य सर्वसामान्य लाभार्थींना ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार मिळाले का? हेही तपासणे गरजेचे आहे. कारण शासनामार्फत पुरविण्यात आलेला धान्यादी माल हा लाभार्थी संख्येनुसार वितरीत केला जातो. तो लाभार्थींपर्यंत न पोहोचता थेट बाजारात विक्री कसा होतो? हाही चिंतनाचा विषय आहे. संचारबदीच्या काळात भूकबळी होऊ नये, यासाठी राज्य शासनाचा निर्णय स्तुत्य असला, तरी काहींसाठी हे कमाईचे साधन झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून काळ्या बाजारात रेशन मालाची परस्पर विक्री करणाऱ्यांना लगाम लावणे गरजेचे आहे.

दक्षता समिती नावालाच

स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारा माल लाभार्थींपर्यंत पोहोचतो का, त्यात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी गावोगावी गाव पातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, या समितीची बैठक कागदोपत्रीच होत असल्याचे म्हटले जात आहे. निदान समितीतील सदस्यांनी रेशन दुकानातील धान्याच्या मालाची तस्करी रोखण्यासाठी गावपातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे.

महसूल विभागाने कारवाई केली का?

गेल्या आठवड्यात तालुक्यातील एका गावावरून स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारा तांदूळ एकत्र वाहनात भरून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी तपासणी केली असता व माहिती घेतली असता, तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता, काळ्या बाजारात तांदूळ विक्रीसाठी नेणाऱ्या आरोपींनी चक्क पोलिसांना मारहाण करून एकाचा हातच जखमी केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने अशांना जरब बसवणे गरजेचे आहे. स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारा तांदूळ परस्पर काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला का नाही? घडलेल्या घटनेबाबत शहादा पुरवठा विभागाने माहिती घेऊन त्या दुकानदाराविरुद्ध कारवाई केली का? केली नसेल तर का नाही? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही, मजुरी नाही, खायला अन्नधान्य नाही? अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून परस्पर काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई होईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.