शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

शेतकऱ्यांनी दिलेला पपईचा दर व्यापाऱ्यांच्या पचनी पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे़ उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शेतकºयांनी तो फेटाळून लावल्याने येत्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील, शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम हे शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते़पाच दिवसांपूर्वी शेतकºयांनी केलेल्या मागणीनुसार व्यापाºयांनी पपईचे दर वाढवले होते़ १५ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो या प्रमाणे हा दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ परंतू पाच दिवस पूर्ण होत नाहीत तोवरच व्यापाºयांनी बाजारपेठेतील मंदीचे कारण देत दर परवडत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे़ या प्रकारामुळे शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दर कमी करण्यास नकार दिला आहे़ दरम्यान बाजार समितीत झालेल्या बैठकीत देण्यात येणाºया १४ रुपयांच्या दरात कपात करण्याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा करण्यात आली़

बैठकीत व्यापाऱ्यांनी पपईचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता़ परंतू त्यावर एकमत झाले नसल्याने बोलणी फिस्कटली होती़ ही बोलणी पुन्हा व्हावी अशी अपेक्षा व्यापाºयांची होती़ त्यानुसार गुरुवारी रात्री बैठक घेण्यात आली़ व्यापारी शेतकºयांना १३ रुपये दर देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे दरांवरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरु असली तरी मागील दराने पपई खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र आहे़ व्यवहार सुरुच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ गुरुवारच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान दर कमी करण्याची गळ घालणाºया व्यापाºयांना दक्षिण भारतातील पपई अडसर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे़ उत्तर भारतात शहादा येथून निर्यात करण्यात येणाºया पपईला मोठी मागणी आहे़ परंतू यंदा या पपईला दक्षिण भारतातून निर्यात करण्यात येणाºया पपईसोबत स्पर्धा करावी लागत आहे़ यातून पपईची आवक वाढल्याने दर कमी झाल्याने येथील व्यापाºयांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून व्यापारी दर कमी करण्यासाठी आग्रही आहेत़

उत्तर भारतातील राज्यात नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पपईला मागणी असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांसोबत संघर्ष करणे टाळत आहेत़ यातून मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उत्पादन खराब होण्याची भिती असल्याने दरांबाबत ओढाताण करणे योग्य ठरणार नसल्याने व्यापाºयांकडून सांगण्यात आले आहे़ परिणामी गुरुवारी होणाºया बैठकीतून योग्य तो मार्ग निघून शहादा तालुक्यातील पपई उत्तर भारतात रवाना होणे सुरुच राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़