शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी दिलेला पपईचा दर व्यापाऱ्यांच्या पचनी पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदी असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला वाढीव दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे़ उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शेतकºयांनी तो फेटाळून लावल्याने येत्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे़शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील, शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम हे शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते़पाच दिवसांपूर्वी शेतकºयांनी केलेल्या मागणीनुसार व्यापाºयांनी पपईचे दर वाढवले होते़ १५ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो या प्रमाणे हा दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ परंतू पाच दिवस पूर्ण होत नाहीत तोवरच व्यापाºयांनी बाजारपेठेतील मंदीचे कारण देत दर परवडत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे़ या प्रकारामुळे शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दर कमी करण्यास नकार दिला आहे़ दरम्यान बाजार समितीत झालेल्या बैठकीत देण्यात येणाºया १४ रुपयांच्या दरात कपात करण्याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा करण्यात आली़

बैठकीत व्यापाऱ्यांनी पपईचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता़ परंतू त्यावर एकमत झाले नसल्याने बोलणी फिस्कटली होती़ ही बोलणी पुन्हा व्हावी अशी अपेक्षा व्यापाºयांची होती़ त्यानुसार गुरुवारी रात्री बैठक घेण्यात आली़ व्यापारी शेतकºयांना १३ रुपये दर देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे दरांवरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा सुरु असली तरी मागील दराने पपई खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र आहे़ व्यवहार सुरुच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ गुरुवारच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान दर कमी करण्याची गळ घालणाºया व्यापाºयांना दक्षिण भारतातील पपई अडसर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे़ उत्तर भारतात शहादा येथून निर्यात करण्यात येणाºया पपईला मोठी मागणी आहे़ परंतू यंदा या पपईला दक्षिण भारतातून निर्यात करण्यात येणाºया पपईसोबत स्पर्धा करावी लागत आहे़ यातून पपईची आवक वाढल्याने दर कमी झाल्याने येथील व्यापाºयांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातून व्यापारी दर कमी करण्यासाठी आग्रही आहेत़

उत्तर भारतातील राज्यात नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पपईला मागणी असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांसोबत संघर्ष करणे टाळत आहेत़ यातून मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उत्पादन खराब होण्याची भिती असल्याने दरांबाबत ओढाताण करणे योग्य ठरणार नसल्याने व्यापाºयांकडून सांगण्यात आले आहे़ परिणामी गुरुवारी होणाºया बैठकीतून योग्य तो मार्ग निघून शहादा तालुक्यातील पपई उत्तर भारतात रवाना होणे सुरुच राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़