शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

नंदुरबार : वारंवारचे लॅाकडाऊन, संचारबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे तरुणांचे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण ...

नंदुरबार : वारंवारचे लॅाकडाऊन, संचारबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे तरुणांचे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढू लागले आहे. यावर उपाय करण्यासाठी तरुणाईची मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव वाढू लागली आहे.

गेल्या वर्षी कोरोना व लॅाकडाऊन यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. असे तरुण अद्यापही सावरलेले नाहीत. अजूनही त्यांना नोकरी मिळू शकली नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात कायम असून नवीन भरती होत नाही. परिणामी मोठ्या आशेने व अपेक्षेने मुंबई, पुणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरात गेलेल्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. एवढे शिक्षण घेऊन, मोठ्या नोकरीचे स्वप्न पाहून हाती काहीच न आल्याने अशा तरुणांमध्ये मनातल्या मनात अपराधीपणा भासू लागला आहे. मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्या सहा महिन्यांपासून अशा रुग्ण असलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, कुटुंबाकडून सांभाळून घेणे या बाबी केल्या तर या प्रकाराला पायबंद घालता येऊ शकतो.

काय असतात तरुणांचे प्रश्न

तरुणांचा प्रश्न सहसा रोजगार व नोकरी हा असतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी आणि लग्नासाठी घरच्या लोकांकडून तगादा लावला जातो. त्यामुळे काहीतरी रोजगार मिळवून लग्न करण्यासाठी तरुणांची धडपड असते.

नोकरी मिळालीच तर ती जर कमी पगाराची आणि कमी दर्जाची राहिली तर त्याचाही परिणाम अशा तरुणांवर होतो. एवढे मोठे शिक्षण घेऊन काय उपयोग, म्हणून मनात न्यूनगंडाची भावना तयार होते. अशा वेळी कुटुंबाने त्यांना साथ देऊन समजून घेणे आवश्यक आहे.

नोकरी, रोजगारासह कुटुंबातील स्थिती, वैवाहिक स्थिती, प्रेमप्रकरण आदी प्रश्न व समस्यादेखील तरुणांच्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

पुरुष व्यक्त होत नाहीत

n मानसिक तणाव असो, दु:ख असो, सहसा पुरुष व्यक्त होत नाहीत असा अनुभव असतो. त्यामुळे मनातल्या मनात खचत जाऊन काही वेळा अप्रिय घटनेपर्यंत असे तरुण जाऊ शकतात.

n आपले दु:ख, समस्या, तणाव जर जवळच्या व्यक्तीजवळ सांगून मन मोकळे केले तर त्यातून उपाय निघू शकतो. त्यासाठी पुरुषांनी व्यक्त होणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

पर्यायी मार्गांचा विचार करावा...

n प्रत्येक समस्या, प्रश्न यांना पर्यायी मार्ग असतो. त्याचाही विचार करणे आवश्यक असते. नोकरी गेली म्हणून त्याच प्रकारची दुसरी नोकरी मिळावी यासाठी तरुणाईचा प्रयत्न असतो. त्याऐवजी रोजगार मिळवून देणारा दुसरा व्यवसाय, शेतीतील विविध प्रयोग केले तर त्यातूनही मोठे उत्पन्न मिळू शकते.

n यासाठी तरुणाईने व्यक्त होणे आवश्यक असते. त्यासाठी जवळच्या मित्राजवळ, पत्नी, आई, वडील किंवा कुटुंबाच्या इतर जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त व्हा, मन हलके करणे गरजेचे असते.