शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर अवघा सात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत जिल्हा राज्यात तळाला असल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत जिल्हा राज्यात तळाला असल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर हा सात ते आठच्या दरम्यान सिमित आहे. किमान १५ ते २० हा दर असणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्ण संख्येला आळा घालावयाचा असेल तर या कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता चार हजाराच्या घरात पोहचली आहे. दीड महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण आढळले आहेत. हा दर पाच पट इतका आहे.नंदुरबारात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. एप्रिल, मे व जून महिन्यात सरासरी आकडा हा २५ ते ४० च्या दरम्यान राहिला. जुलै महिन्यापासून मात्र रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत होत गेली. आजच्या स्थितीत दीड महिन्यात तब्बल पाच पट रुग्ण संख्या वाढली आहे. ४५ दिवसात आडेतीन हजार रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.केवळ सात जणांची तपासणीएक कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील किमान १५ ते १७ जणांची तपासणी करणे आवश्यक असते. तेव्हढ्या लोकांचा स्वॅब घेणे किंवा त्या लोकांनी स्वॅब देणे आवश्यक असते. परंतु नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच केवळ सात ते नऊ जणांचीच तपासणी केली जात आहे. त्यामुळे सुरुवातीला बाधित आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी होते. आत बाधितांची संख्या वाढलेली असतांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचीही संख्या वाढविणे आवश्यक असतांना तसे होत नसल्याचे दिसून येत आहे.स्वत:हून स्वॅब देणारे जास्तजिल्ह्यात भितीपोटी किंवा मानसिकतेतून स्वत:हून स्वॅब देणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ग्रामिण भागातील लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवसाला आरटीपीसीआर च्या जवळपास अडीचशे ते तीनशे चाचण्या होत आहेत. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.आकडा चार हजार पारकोरोना बाधितांचा आकडा तब्बल चार हजार पार झाला आहे. १ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान साडेतीन हजार रुग्ण वाढले आहेत. ३१ जुलै रोजी ५४७ रुग्ण संख्या होती. ती १५ सप्टेबर पर्यंत तब्बल चार हजार ५३ इतकी आहे. ४५ दिवसात पाच पट रुग्ण संख्या वाढली आहे. जुलैच्या अखेर मृतांची संख्या ३१ होती ती १५ सप्टेबरपर्यंत तब्बल १०५ झाली आहे.जिल्ह्यात पहिल्या दोन महिन्यात अर्थात एप्रिल व मे महिन्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्येचा दर हा महिनाभरात दुप्पट असा होता. जुलै महिन्यापासून तो तिप्पट झाला. आॅगस्ट ते १५ सप्टेबर या दरम्यानच्या ४५ दिवसात तो तब्बल पाच पट वाढला आहे. मृत्यू संख्या देखील तिप्पट वाढली आहे. येत्या काळात चाचण्या वाढविल्यावर बाधीत आणि मृतांची संख्या वाढणार आहे.