शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

११ महिन्यांनी सुरु झाली महाविद्यालये तुरळक हजेरी ; आवारामध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. परंतु विद्यापीठाने स्वीकारलेले ५० टक्के क्षमतेचे धोरण आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे पहिल्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तुरळक अशी विद्यार्थी संख्या दिसून आली. नंदूरबार जिल्ह्यात कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अखत्यारितील एकूण ४३ महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान सोबत शिक्षणशास्त्र, औषध निर्माणशास्त्र यासह विविध विद्याशाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी ही महाविद्यालये २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर बंद करण्यात आली होती. २२ मार्च २०२० नंतर महाविद्यालयांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेत ऑनलाईन निकाल लावण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी ११ महिन्यांपासून महाविद्यालयांपासून दुरावले होते. यामुळे दरदिवशी गजबजणारी महाविद्यालये अक्षरश भकास झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली होती. विविध उपाययोजनांचा आधार घेत महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. दरम्यान, विद्यापीठानेही दर दिवशी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावण्याचे महाविद्यालयांना सूचित केले होते. यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी महाविद्यालये गजबजतील असा अंदाज होता. परंतु पहिल्या दिवशी नंदुरबार शहारातील चार प्रमुख तर जिल्ह्यातील विविध ३९ महाविद्यालयांमध्ये तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते. येत्या काळात एसटी बस पासेस तसेच वसतीगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात ७० टक्के विद्यार्थी बाहेरुन येतात. 

१८ हजार विद्यार्थी n नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ४३ महाविद्यालयात एकूण १८ हजार ३५० विद्यार्थी यंदा विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी येणार नसले तरी निम्मे विद्यार्थी येण्याची शक्यता होती. यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशद्वारावर मास्क, सॅनेटायझर्स आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून आत सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ताप किंवा इतर तत्सम लक्षणे असलेले विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.