शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

११ महिन्यांनी सुरु झाली महाविद्यालये तुरळक हजेरी ; आवारामध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये ११ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारी सुरू करण्यात आली. परंतु विद्यापीठाने स्वीकारलेले ५० टक्के क्षमतेचे धोरण आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे पहिल्या दिवशी महाविद्यालयांमध्ये तुरळक अशी विद्यार्थी संख्या दिसून आली. नंदूरबार जिल्ह्यात कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अखत्यारितील एकूण ४३ महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान सोबत शिक्षणशास्त्र, औषध निर्माणशास्त्र यासह विविध विद्याशाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी ही महाविद्यालये २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर बंद करण्यात आली होती. २२ मार्च २०२० नंतर महाविद्यालयांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेत ऑनलाईन निकाल लावण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ही १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी ११ महिन्यांपासून महाविद्यालयांपासून दुरावले होते. यामुळे दरदिवशी गजबजणारी महाविद्यालये अक्षरश भकास झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली होती. विविध उपाययोजनांचा आधार घेत महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले होते. दरम्यान, विद्यापीठानेही दर दिवशी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावण्याचे महाविद्यालयांना सूचित केले होते. यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी महाविद्यालये गजबजतील असा अंदाज होता. परंतु पहिल्या दिवशी नंदुरबार शहारातील चार प्रमुख तर जिल्ह्यातील विविध ३९ महाविद्यालयांमध्ये तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते. येत्या काळात एसटी बस पासेस तसेच वसतीगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात ७० टक्के विद्यार्थी बाहेरुन येतात. 

१८ हजार विद्यार्थी n नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ४३ महाविद्यालयात एकूण १८ हजार ३५० विद्यार्थी यंदा विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी येणार नसले तरी निम्मे विद्यार्थी येण्याची शक्यता होती. यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशद्वारावर मास्क, सॅनेटायझर्स आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून आत सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ताप किंवा इतर तत्सम लक्षणे असलेले विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.