शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पावसाची सरासरी 30 टक्के तूट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:00 IST

यंदा अवघा 67 टक्के पाऊस : आज पावसाळ्याचा शेवटचा दिवस, धडगावने गाठली सरासरी

नंदुरबार : यंदा पावसाने नंदुरबार जिल्ह्यावर अवकृपाच केली आहे. पावसाळ्याचे चार महिने रविवारी संपणार आहेत. अधिकृत पावसाळा देखील संपणार आहे. असे असतांना यंदा सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची 30 टक्के तूट यंदा कायम राहणार आहे. गेल्या 16 वर्षातील यंदा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस आला तरी त्याचा फारसा उपयोग आता होणार नाही. दरम्यान, आतापासूनच अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.नंदुरबार जिल्ह्याची एकुण पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. गेल्या चार वर्षाचा विचार करता केवळ गेल्यावर्षीच पावसाने सरासरीची नव्वदी गाठली होती. यंदा राज्यभरात सर्वत्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आणि सरासरीच्या तुलनेत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नंदुरबारवर मेघराजाने पाठ फिरविल्याने पावसाळ्याच्या चारही  महिन्याची सरासरी देखील गाठता आली नसल्याचे चित्र आहे.यंदा संपुर्ण चार महिन्यात नियमित आणि अपेक्षीत पाऊसच झाला नाही. जून महिन्यात तिस:या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली. पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पेरण्यांना सुरुवात झाली. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. सर्वत्र सारखा पाऊसच झाला नाही. नदी, नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. त्याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. खरीपातील पिकांची उत्पादकता 30 ते 35 टक्क्यांनी घटणार तर आहेच परंतु रब्बी हंगाम देखील जेमतेमच राहणार असल्याचे दिसून येत आहे.16 वर्षातील सर्वात कमी नोंदजिल्ह्यात 2002 मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर्षी सरासरीचा 60 ते 65 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधीक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. विरचक प्रकल्पही पुर्ण झालेला नसल्यामुळे नंदुरबार शहराला तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत होता. खरीपाप्रमाणेच रब्बीचाही हंगाम आला नव्हता. यंदा देखील 2002 च्या दुष्काळाचीच पुनरावृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच नियोजन करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. सर्वात कमी नवापूर, नंदुरबारयंदा सर्वात कमी पाऊस नवापूर व नंदुरबार तालुक्यात नोंदला गेला आहे. नवापूर तालुक्यात सरासरीचा केवळ 56 तर नंदुरबार तालुक्यात सरासरीचा 59 टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यता सरासरीचा 92 टक्के नोंदला गेला आहे. इतर तालुक्यांमधील स्थिती देखील समाधानकारक नाही. शहादा व तळोदा तालुक्यात सरासरी 68 तर अक्कलकुवा तालुक्यात 64 टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग नेहमीच अवर्षणप्रवण राहिला आहे. गेल्या सहा वर्षापासून पूव्रेकडील शनिमांडळ, रनाळा, कोपर्ली, कोळदा, खोंडामळी मंडळात सरासरीचा 50 ते 65 टक्के पाऊस होत आहे. या वर्षी रनाळा, कोपर्ली व शनिमांडळ मंडळात 30 त 35 टक्के सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांची वाढ आधीच खुंटली होती. परिणामी उत्पादकता निम्म्यार्पयत येणार आहे. पीके तर हातून गेलीच आता पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट या भागातील गावांवर ओढावणार आहे. त्यामुळे शेतकरी आतापासूनच हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात 2015 मध्ये सरासरीचा 70 टक्के पाऊस झाला होता. एकुण पावसाळ्यात अवघे 33 दिवस पावसाचे होते. त्यात नंदुरबार तालुक्यात 61.57 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस अवघे 33 होते. नवापूर तालुक्यात 53 टक्के पाऊस होऊन 33 दिवस पावसाचे होते. शहादा तालुक्यात 70 टक्के पाऊस होऊन 31 दिवस पावसाचे होते. तळोदा तालुक्यात 84 टक्के पाऊस होऊन 40 दिवस पावसाचे तर धडगाव तालुक्यात 84 टक्के पाऊस होऊन 34 दिवस पावसाचे होते.जिल्ह्यात 2016 हे वर्ष पावसाच्या दृष्टीने समाधानकारक होते. या वर्षी 50 दिवस पावसाचे होते. शिवाय सरासरीचा 81 टक्के पाऊस झाला होता. त्यात नंदुरबार तालुक्यात 39 दिवस पावसाची नोंद होती. सरासरी 83 टक्के पाऊस नोंदला गेला. नवापूर तालुक्यात 73 टक्के पाऊस झाला होता. 48 दिवस पावसाचे होते. शहादा तालुक्यात सर्वात कमी अर्थात 63 टक्के पाऊस झाला. 33 दिवसच पावसाचे होते. तळोदा तालुक्यात 91 टक्के पाऊस झाला होता. 51 दिवस पावसाचे होते. अक्कलकुवा तालुक्यात 71 टक्के सरासरी पाऊस झाला. 57 दिवस पावसाचे होते तर धडगाव तालुक्यात 112 टक्के पाऊस होऊन 72 दिवस पावसाचे होतेजिल्ह्यात 2017 मध्ये देखील तब्बल 94 टक्के पावसाची नोंद झाली होती. 54 दिवस पावसाचे नोंदले गेले होत. सर्वाधिक पाऊस अक्कलकुवा तालुक्यात 111 टक्के झाला होता. नंदुरबार तालुक्यात 55 दिवस पाऊस होऊन 73 टक्के सरासरी पावसाची नोंद   झाली होती. नवापूर तालुक्यात 48 दिवस पाऊस होऊन 84 टक्के पावसाची नोंद       होती. शहादा तालुक्यात 45 दिवस पाऊस होऊन 79 टक्के पाऊस नोंदला गेला          होता. तळोदा तालुक्यात 101 टक्के पाऊस होऊन 50 दिवस पावसाचे होते.   अक्कलकुवा तालुक्यात 111 टक्के पाऊस नोंद होऊन सर्वाधिक 74 दिवस पावसाचे  होते. तर धडगाव तालुक्यात 103 टक्के नोंद होऊन 52 दिवस पावसाचे होते. गेल्या 16वर्षात या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.