शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पिकांच्या वाढीसाठी व दुबार पेरणी टाळण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.शहादाशहाद्यात शुक्रवारी रात्री 10 वाजता पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठय़ा प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजूनही शहादेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा अजूनही नद्या, नाल्यांना पूर आला नसल्याने पाणीटंचाईची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.हळदाणीनवापूर तालुक्यातील हळदाणीसह मासलीपाडा परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाने विजांच्या गडगडाटासह आलेल्या एक तास चाललेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले. मात्र काही परिसरात तुरळक पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. परंतु परिसरातील नदी नाल्यांना अद्यापर्पयत पूर आला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नवापूरनवापूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही जटील राहीला आहे. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका व ज्वारी यासह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

रांझणी परिसरात पावसाची हुलकावणीरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाचे वातावरण तयार होऊनही पाऊस बरसत नसल्याने शेतक:यांची निराशा होत आहे. शक्रवारी रात्री जोदार वा:यासह विजांचा कडकडाट परिसरात होत होता. परंतु प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाली नाही. शनिवारी दिवसर चांगले तापमान होते. मात्र वारा बंद झाल्याने एकदाची पावसाला कधी सुरुवात होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु प्रत्यक्षात पाच ते दहा मिनिट पावसाच्या बारीक सरी पडल्याने या परिसरात पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कापूस, ज्वारीसह मका व सोयाबीन सारख्या पिकांसाठी पाऊस अत्यावश्यक आहे.