शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

रघुवंशी-गावितांचे राजकारण पुन्हा नव्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात काही ठराविक घराण्यांचा प्रभाव आहे. त्यात दोन महत्त्वाची घराणी म्हणजे रघुवंशी आणि गावीत घराणे. अर्थातच ...

नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात काही ठराविक घराण्यांचा प्रभाव आहे. त्यात दोन महत्त्वाची घराणी म्हणजे रघुवंशी आणि गावीत घराणे. अर्थातच नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्यालयी या दोघांचा प्रभाव असल्याने सातत्याने जिल्ह्याच्या राजकारणात हे दोन्ही घराणे चर्चेत राहिले आहेत. तब्बल अडीच दशके एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही घराणे गेल्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आल्याने जिल्ह्यातील जनतेलाही विकासाचे नवे स्वप्न पडू लागले होते. नव्हे तर ज्येष्ठ नेते आ. डॉ. विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकाच व्यासपीठावर येऊन आपण एकत्र आल्याने आता जिल्ह्याच्या विकासाचा वेग सुसाट होईल, असे जाहीर वक्तव्यही केले होते; पण राजकारणात कधी काय घडेल, हे सांगणे कठीण असते. नेमका तोच अनुभव जिल्ह्यातील जनतेला सध्या येत आहे. दीड वर्षापूर्वी एकत्र येऊन विकासाचे स्वप्न दाखवणारे हे दोन्ही नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आग ओकल्यागत आरोप करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या पुन्हा नेहमीप्रमाणेच दोन दिशा राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून सध्या जिल्ह्यातील राजकारणात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावीत यांचा राजकारणात अचानक प्रवेश झाला आणि तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. कारण पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून त्यांना दोन-अडीच वर्षांतच राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. अर्थात त्यांच्या राजकारणाची सुरुवातच रघुवंशी घराण्याच्या विरोधापासून झाली. त्यामुळे साहजिकच रघुवंशी आणि गावीत घराणे एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणूनच राहिले. हा विरोध इतका टोकाचा होता की, राज्यात आघाडीचे सरकार असतानाही हे दोन्ही नेते आघाडीच्या पक्षात राहूनही त्यांच्या राजकीय वैमनस्याचे पडसाद सातत्याने जिल्ह्याच्या राजकारणात उमटत होते. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय विरोधामुळे जिल्ह्याच्या विकास कामावरही परिणाम होत असल्याचे लोकांमध्ये बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतराच्या लाटेत चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांची भाषा युतीची सुरू झाली. निवडणुकीतही भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावीत हेच असल्याने दोघांचे सूर जुळू लागले. राजकीय बैठका आणि सभांमधून ते एकत्र येऊन एकीची भाषा बोलू लागले. रनाळे, ता. नंदुरबार येथील प्रचारसभेत तर या दोघांनी आम्ही एकत्र आल्याने आता जिल्ह्याच्या विकासाचा वेग सुसाट होईल, असे आश्वासनही दिले होते. पुढे राज्यातील राजकारणाचे समीकरण बदलले. सत्ता स्थापन करताना युती तुटली; पण या दोन्ही घराण्यांतील समन्वय मात्र काही दिवस बऱ्यापैकी टिकून होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही एकमेकांची भूमिका सौम्यच राहिली होती. त्यानंतर जि.प.तील भिंत तोडण्याच्या प्रकरणावरून एकमेकांच्या विरोधातील राजकीय ठिणगी पडली; पण ती तेवढ्याच लवकर शमली होती. या दोन्ही घराण्यांतील समन्वयाचा सूर जुळत असताना गेल्या महिन्यात रेमडेसिविर इंजेक्शन व जिल्हाधिकारी यांच्या मुद्यातून या दोन्ही घराण्यांतील वैमनस्य अचानकपणे चव्हाट्यावर आले. फेसबुक लाइव्ह आणि पत्रकार परिषदेतून खा. डॉ. हीना गावीत व चंद्रकांत रघुवंशी या दोघांनी एकमेकांना अतिशय टोकाचे आरोप केल्याने राजकारणात हा विषय साहजिकच चर्चेत आला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या संस्थेला रेमडेसिविर इंजेक्शन दिले होते. तो मुद्दा राजकीय झाला आणि रघुवंशी, खा. डॉ. हीना गावीत तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या त्रिकुटांचे आरोप-प्रत्यारोपाने सध्या जिल्हा ढवळून निघाला आहे. त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर असल्याने उपाययोजनांसाठी वादविवाद सोडून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत मुद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतरही रघुवंशी आणि गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांना नगरपालिकेच्या राजकीय मुद्यावर आव्हानही दिले. अर्थात सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने जनता त्रस्त आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी मृत्यू मात्र चिंताजनक आहेत. लसीकरणाचा वेग अद्याप हवा तसा गतीत आलेला नाही. आरोग्याचे प्रश्न, विकासाचे प्रश्न गंभीर आहेत. अशा स्थितीत कोरोना उपाययोजनांसाठी सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्याबाबत नागरिकांकडूनही कुणाबद्दल तक्रार नाही. नागरिकांना फक्त सेवा हवी आहे आणि ती सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुरवावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनीच राजकीय व श्रेयाच्या मुद्यावर एकमेकांची उणे-दुणे न काढता एकत्रपणे काम करण्याची आवश्यकता आहे.