शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

शहाद्यात अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाटय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:57 IST

शहराची होतेय कोंडी : सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांचा अतिक्रमण काढण्याला पाठींबा

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करीत पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांनी अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी         केल्याने शहाद्यातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहादा शहर हे विकसनशील शहर असून, चोहोबाजुंनी शहराची वाढ होतआहे. पूव्रेकडे लोणखेडा बायपास रोडच्या पलिकडे नागरिकांच्या  वसाहती पोहोचल्या आहेत. पश्चिमेकडे मनरदर्पयत तर उत्तरेस मलोणीर्पयत शहराचा विस्तार झाला आहे. दक्षिणेला भेंडवा नाल्यार्पयत लोकवसती झाली आहे.  एकंदरीतच शहराची चोहोबाजुने वाढ होत आहे. मात्र असे असले तरी  शहरात दिवसेंदिवस  वाढणारे अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच अतिक्रमणाचादेखील विस्तार होत असल्याने संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत  आहे. बसस्थानक परिसर, नगपालिका परिसर, दोंडाईचा रोड, जुना मोहिदा रोड, प्रकाशा रोड, मेनरोड, डोंगरगाव रोड, खेतिया रोड, पाडळदा चौफुली अशा सर्वच भागात अतिक्रमण हात-पाय पसरत असल्याने शहराचे विद्रूपीकरणाबरोबरच शहराची शांतताही धोक्यात आली आहे. अतिक्रमणा सोबतच अवैध व्यवसायही फोफावत असल्याने शहर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून शहरात दंगली सारख्या घटना घडल्याचा इतिहास असल्या कारणाने अतिक्रमणावर पुन्हा एकदा हातोडा चालविण्याची वेळ आली आहे.बसस्थानक परिसर आणि भाजी मंडईतील अतिक्रमण पालिकेने काढूनही या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने रहदारीची कोंडी होते. बसस्थानकासमोरील टप:या, लॉ:यांचे आणि दुकानांसमोर लावलेल्या वाहनांमुळे बसचालकांना कसरत करावी लागते. डोंगरगाव रोडवर पुन्हा टप:यांचे अतिक्रमण वाढत असून, अवैध वाहतुकीच्या वाहनांची यात भर पडत असून, या रस्त्यावरही रहदारीची कोंडी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळार्पयत लॉरीधारकांच्या अतिक्रमणाने हा रस्ता दुहेरीमार्ग असूनही या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. पालिकेच्या समोरील चौक टप:यांच्या अतिक्रमणाने भरला असून, नेहमी या चौकात किरकोळ कारणावरून वाद होतात. स्टेट बँक चौकातील भाजी व्यवसायिकांच्या गाडय़ा आणि मोहिदा रोडवरील खाद्य पदाथ्र्याच्या गाडय़ांनी झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालक, नागरीक सारेच त्रस्त झाले आहेत. मेनरोड व नेहरू चौकातील अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून चार चाकी वाहने चालूच शकत नाही, अशी स्थिती आहे.अतिक्रमणाच्या समस्येने संपूर्ण शहर ग्रस्त झाले असून, शहरभर रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्थायी अतिक्रमणासोबतच शहरात स्थायी अतिक्रमणेदेखील मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भर रस्त्यात घरे, दुकाने आणि प्रार्थन स्थळांचे मोठ-मोठे अतिक्रमण झाल्याने रस्ता असूनही अनेक ठिकाणी त्या रस्त्याचा वापर करता येत नाही. अतिक्रणाची ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातील सदस्यांनी अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करून अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी केल्याने प्रशासनाने विनाविलंब अतिक्रमणाच्या समस्येवर रामबाण उपाय करणे आवश्यक आहे.