शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

ऑनलाईन बाजारानुसार मिळणार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:33 IST

5 ई-मंडीचा औपचारिक शुभारंभ : पहिल्या दिवशी इंटरनेटला अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय ई-मंडी योजनेअंतर्गत नंदुरबार बाजार समितीत ऑनलाईन लिलाव करण्यात आले. सुरुवातीला कनेक्टीव्हिटीची अडचण आणि देशभरातील इतर बाजार समितींमध्ये याअंतर्गत प्रलंबीत असलेले काम यामुळे पहिल्या दिवशी केवळ औपचारिक शुभारंभ करण्यात आला. परंतु आजपासून शेतक:यांच्या शेतामालाचा वाहनातच लिलाव करण्यास सुरुवात झाली आहे.देशभरात गुरुवार 21 सप्टेंबरपासून ई-नाम प्रणाली अंतर्गत बाजार समितींमध्ये ऑनलाईन लिलाव सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समितींची निवड करण्यात आली असून त्यात विभागातून नंदुरबार बाजार समितीचा समावेश आहे. या योजनेचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शेतकी संघाचे बी.के.पाटील, उपसभापती अनिल गिरासे, संचालक डॉ.सयाजीराव मोरे, सचिव योगेश अमृतकर आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत बाजार समितीला दहा संगणक, एलईडी स्क्रीन आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता बाजार समितीच्या गेटवरच वाहनाची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. ते वाहन थेट बाजार समिती आवारात उभे करण्यात येईल. संबधित व्यापारी शेती मालाची क्वालिटी पाहून त्यानुसार वाहनातच लिलाव करतील. अर्थात त्यासाठी संगणक आणि मोबाईल अॅप्समध्ये राज्य किंवा देशातील संबधीत मालाला जेव्हढा भाव असेल तो देण्याचा प्रय} राहील. अर्थात त्यासाठी शेतक:यांनी देखील चानाक्षपणे ई-मंडीअंतर्गत असलेला भाव पहाणे आवश्यक राहणार     आहे. वाहनात लिलावानंतर तो माल संबधित व्यापा:याच्या प्लॉटवर नेण्यात येईल. त्यामुळे शेतकरी दुपार्पयत किंवा सायंकाळर्पयत आपल्या घरी परत जावू शकणार आहे. सध्याच्या अर्थात पारंपारिक लिलाव पद्धतीत गर्दीच्या वेळी शेतक:यांना किमान एक ते दोन दिवस बाजार समितीत लिलावासाठी थांबावे लागत होते.कनेक्टीव्हिटीची अडचणराज्य व देशभरात अद्यापही या बाजार समित्या एकमेकांशी पुर्णपणे जोडल्या गेलेल्या नाहीत. आणखी 20 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी इंटरनेट कनेक्टीव्हिटीला मोठय़ा अडचणी आल्या होत्या. तरीही त्यातून मार्ग काढत येथील बाजार समितीत त्याची सुरुवात करण्यात आली. चेकद्वारे पेमेंटशेतक:यांचा विक्री करण्यात आलेल्या शेतीमालाचे पेमेंट हे ऑनलाईन किंवा चेकने परस्पर बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतक:यांना येतांना बँक पासबूकची ङोरॉक्स व आधारकार्ड आणणे आवश्यक ठरणार आहे. यामुळे कॅशलेश व्यवहाराचाही उद्देश साध्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटापूर्वी पारंपारिक तोलाईमध्ये शेतकरी काही प्रमाणात नाडला जात असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आता इलेक्ट्रॉनिक वजनकाटा राहणार   आहे. त्यात शेतमाल भरलेले वाहन आणि शेतमाल खाली करून आलेले वाहन यांचे वजन करून एकुण शेतमालाचे वजन काढले जाणार आहे. त्यामुळे तोलाईबाबत होणा:या तक्रारीही काही प्रमाणात कमी होणार आहेत.