शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंचे दर आठवड्याला कमी-अधिक होत असल्याचे चित्र असून ...

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंचे दर आठवड्याला कमी-अधिक होत असल्याचे चित्र असून पेट्रोल - डिझेल, गॅस दरवाढीसोबतच भाजीपाला आणि डाळीचे भावही वाढले आहेत. याचा थेट फटका सामान्यांना बसत आहे.

बाजापेठेत आवक होणाऱ्या तूर, मसूर, उडीद आणि चणाडाळीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. वाढत्या महागाईवर परिणाम म्हणून बहुतांश नागरिक गरजेपुरतेच डाळींची खरेदी करत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. पर्यायी स्वस्त डाळींवर अधिक भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून यातून बाजारपेठेत खपावर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ आणि ठाेक विक्रेत्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठीचा वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाली आहे.

म्हणून डाळ महागली

जिल्ह्यात गेल्या काही काळात कडधान्य पिकांचे उत्पादन हे कमीच होते. कोरोनामुळे या कडधान्याची विक्री रखडल्याने मालाची कमतरता आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर हे मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मोठ्याप्रमाणावर वाढले असल्याची वस्तुस्थिती आहे. त्याचे परिणाम हे महागाईवर आणि डाळीवर झाल्याचे समोर आले आहे.

डाळींच्या मालवाहतुकीचा खर्च हा वाढला आहे. व्यापाऱ्यांनाही मालाची वाहतूक करण्यासाठी वाढीव खर्च येत आहे.

भाजीपाला स्वस्तच...

दरम्यान, एकीकडे किराणा दरांममध्ये वाढ होत असताना भाजीपाला दर मात्र स्थिर आहेत. काही भाज्यांचे दर हे कमी झाले आहेत. पावसाळा असल्याने आवक अधिक असल्याने दरांमध्ये घसरण झालेली नसली तरी भाज्यांचे दर हे कमीच असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात येणारा भाजीपाला हा स्थानिकच पिकवला जात असल्याने वाहतूक खर्च कमी आहे.

दैनंदिन आहारात भाजीपाला आणि डाळी या गरजेच्या आहेत. यातून त्यांची खरेदी ही नित्याची आहे. दरवाढ झाली असली तरी गरज म्हणून या वस्तू घ्याव्याच लागणार आहेत. जेवढी गरज तेवढीच खरेदी करावी लागेल.

जगन्नाथ पवार, नंदुरबार.

भाजीपाला दर खूप नसले तरी डाळी मात्र महागल्या आहेत. यामुळे नियोजन करून खरेदी आणि त्यांचा वापर करण्याची वेळ, महिला वर्गावर आली आहे.

रेखा माळी, नंदुरबार.