शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

सोशल मिडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती सप्ताह : नंदुरबार पोलीस दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:17 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी व महिलांवर होणा:या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभुमिवर पोलीस दलातर्फे 1 ते 8 मार्च दरम्यान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान, तरुणी, महिला यांना सोशल मिडियासंदर्भात विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह आयोजित करणारे नंदुरबार पोलीस दल ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी व महिलांवर होणा:या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभुमिवर पोलीस दलातर्फे 1 ते 8 मार्च दरम्यान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान, तरुणी, महिला यांना सोशल मिडियासंदर्भात विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह आयोजित करणारे नंदुरबार पोलीस दल हे राज्यातील पहिलेच ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, रोपोसो यासह सोशल मिडियाच्या इतर माध्यमातून तरुणी व महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सायबर क्राईम अंतर्गत अनेक गुन्हे देखील दाखल होत आहे. एक सामाजिक चिंतेची बाब म्हणून याकडे पाहिले जात आहे. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी यंदाचा महिला दिन एक अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात ठरविले आहे. जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्याशी चर्चा करून संजय पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. 1 ते 8 मार्च दरम्यान जिल्हाभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात केवळ तरुणी आणि महिला यांना प्रबोधनपर विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सोशल मिडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची व त्याअंतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींना, महिलांना मैत्री करण्याच्या माध्यमातून संपर्क केला जातो. एकदा मैत्री झाली की त्या माध्यमातून संपर्क वाढवून, गोड बोलून समोरच्या व्यक्तीचे मन जिंकले जाते. त्या माध्यमातून प्रेम आणि शाररिक आकर्षण निर्माण करून तरुणी व महिलांचे शोषण केले जात असते. महिला व तरुणी देखील त्याला बळी पडतात. समोरचा कोण, कुठला, त्याचे नेचर, त्याची कौटूंबिक व गुन्हेगारी पाश्र्वभुमी न पहाता केवळ समोरच्या व्यक्तींच्या लाघवी बोलण्यावर विश्वास ठेवून महिला व तरुणी फसविल्या जातात.अशा प्रकारच्या घटना या आता सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांनी बदनामीच्या भितीने आपले जीवन संपविल्याचेही समोर येत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने यासंदर्भातील जनजागृतीवर भर देण्याचे ठरविले आहे.अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे नंदुरबार जिल्हा पोलीस दल पहिले ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमाची व्यापकता आणि गांभिर्य अधीक राहावे यासाठी पोलीस अधीक्षक संजय पाटील विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत.