शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वन आणि कृषी विभागामार्फत नागरिकांना रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा़ यात वन आणि कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा़ यात वन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश पालकमंत्री अ‍ॅड़ के. सी. पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.बैठकीत अ‍ॅड़ पाडवी यांनी मनरेगांतर्गत ग्राम रोजगार सेवकांना नवे जॉबकार्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहन शेत बांधावर फळझाडे लागवडीच्या लाभाची माहिती द्यावी. चारोळी, महूची लागवड करून त्याच्या व्यावसायिक उपयोगाबाबत विचार होवून त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत आराखडा तयार करावा. आमचूर उत्पादनासाठी उपयुक्त आंब्याच्या जातींची लागवड करावी व कृषी विभागाने अशा जातींच्या नर्सरी तयार कराव्या. औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीतील उद्योगात असलेल्या संधीची माहिती युवकांना द्यावी. जिल्ह्यात अधिकाधिक वन धन केंद्र सुरू करण्यासाठी नियोजन करावे तसेच सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकांची संख्या वाढवावी असे आदेश दिले़ प्रकल्प कार्यालयाने शासन निर्णयानुसार शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांची नोंदणी करावी, त्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करावा़ गेले दोन महिने बाहेरगावी असलेल्या मजुरांना त्या महिन्याचे धान्य मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. पावसाळयात दुर्गम भागात अन्नधान्य वेळेत पोहोचेल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांनी बैठकीत केल्या़बैठकीत पूरहानी कार्यक्रमात रस्ते दुुरुस्ती आणि बँकांकडून पीककर्ज देण्याबाबत चर्चा करण्यात येऊन सूचना देण्यात आल्या़ जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना योग्यप्रकारे राबविल्या आहेत. परराज्यातील मजुरांना पाठविण्याबाबत जिल्ह्याच्या कामगिरीचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. येत्या काळातही संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही अ‍ॅड़ पाडवी यांनी बैठकीत केल्या़ जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले़ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातून परराज्यातील २६ हजार १०९ मजूरांना तर राज्यात इतर भागातील १ हजार ६७५ नागरिकांना बसेसद्वारे सोडण्यात आले. ८६ हजार नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. जिल्ह्यात १६ प्रतिबंधीत क्षेत्रात १० हजार ८४६ कुटुंबातील ५० हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने संचारबंदी कालावधीत २ हजार ८२३ वाहनांवर कारवाई करुन ३७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. शिधापत्रिकाधारकांना पुरवठा विभागाने ९६ टक्के धान्य वाटप केल्याची माहिती दिली़जिल्ह्यात अमृत आहार योजनेंतर्गत २१ हजार स्तनदा व गरोदर मातांना तर १ लाख १३ हजार बालकांना लाभ देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली़