शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास वीजपुरवठा द्या, अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क असलोद : शहादा तालुक्यातील असलोद येथे नळ पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कूपनलिका व विहिरी असून त्यासाठी २४ तास ...

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद येथे नळ पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कूपनलिका व विहिरी असून त्यासाठी २४ तास वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वीज वितरण कंपनीने नळपाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.असलोद येथे नळपाणीपुरवठा योजनेसाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर कूपनलिका व विहीर असून त्याला २४ तास वीजपुरवठा मिळत नसल्याने गावात पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. विहीर व कूपनलिकेला मुबलक पाणीसाठा असूनदेखील पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रात्री-बेरात्री पाण्यासाठी भटकंती केली जाते. ग्रामपंचायत व प्रशासनाने अनेकवेळा वीज वितरण कंपनीला याबाबत कळविले असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या ४ आॅगस्टपर्यंत नवीन विद्युत रोहित्र बसवून २४ तास वीजपुरवठा करून गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नाही तर संबंधित वीज कंपनीच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, पंचायत समिती व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राजेश कदम, अजय सोनवणे, वेडू पाटील, दिलवर गिरासे, राकेश थोरात आदी ३० जणांच्या सह्या आहेत.ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांचीपाण्यासाठी भटकंतीअसलोद येथे पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र या पाणीपुरवठा योजनेला पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या शेतीकामे सुरू असल्याने मजुरांना रोजगार बुडवून पाण्याच्या शोधासाठी फिरावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.