शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

आश्रमशाळांच्या स्थलांतरास विरोध : दहेल व कंकाळामाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:28 IST

पालकांचा प्रकल्प कार्यालयावर ठिय्या

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील दहेल व कंकाळामाळ या दोन शासकीय आश्रमशाळांच्या स्थलांतर विरोधात तेथील आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्पात तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. या वेळी पालकांनी शाळा स्थलांतराबाबत अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. शाळांचे स्थलांतर रद्द झाल्याशिवाय ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर याप्रकरणी पालकांना विश्वासात घेवून एक समिती नेमून जागेची पाहणी केली जाईल. मात्र या शाळा पुन्हा तेथेच भरण्याचे            आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. तथापि                कडक उन्हात पालकांनी तब्बल चार तास प्रकल्पासमोर ठिय्या मांडला होता.भौतिक सुविधांच्या अभावामुळे तळोदा आदिवासी एकात्मिक विभाग प्रकल्पाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रातील धडगाव तालुक्यातील झापी, सिंदीदिगर, तेलखेडी, त्रिशुल, शेलगदा या पाच तर अक्कलकुवा तालुक्यातील दहेल, कंकाळामाळ, गमन, नाला, खडकापाण या पाच अशा एकूण 10 शासकीय आश्रमशाळांचे स्थलांतर त्या-त्या तालुक्यात केले आहे. तथापि डनेल व कंकाळामाळ या शाळा ज्याठिकाणी स्थलांतर झाल्या आहेत. तेथेदेखल भौतिक सुविधांची वानवा आहे. ज्या इमारती आहेत तेथे खोल्या अपूर्ण आहेत. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा         संख्येने विद्यार्थी राहू शकणार नाही. त्यामुळे विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा प्रश्ननिर्माण होणार आहे. या शाळांचे स्थलांतर रद्द करून पुन्हा तेथेच           शाळा सुरू कराव्यात यासाठी आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेत तेथे तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. या वेळी प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी पालकांच्या समोर येवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. या वेळी पालकांनी चांगले धारेवर धरले          होते.वास्तविक शाळा स्थलांतर केलेल्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. तेथील हातपंप बंद असल्यामुळे जवळील नाल्यावर आंघोळीसाठी विद्याथ्र्याना जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. इमारतीचा प्रश्न असल्यामुळे शाळांचे तात्पुरते स्थलांतर केल्याचे प्रकल्पाधिकारी गौडा यांनी पालकांना सांगितले. शिवाय जागांचा प्रस्तावदेखील संबंधित वन विभागाकडे परवानगीसाठी पाठविला आहे. मात्र पालकांचे यावर समाधान झाले नाही. कारण शासकीय जागे बरोबरच खाजगी जागा दान देण्याचा प्रस्ताव प्रकल्पाकडे गेल्या अनेक वर्षापासून दिला आहे. त्यावर अजूनही प्रकल्पाने कार्यवाही केली नाही. अन् आता अचानक शाळा स्थलांतर केल्याने पालक अधिकच संतप्त झाले होते. भौतिक सुविधांबाबत आतापावेतो प्रकल्पाने उदासिन धोरण घेतले होते. आम्ही आमची घरे शाळांसाठी देतो मात्र या शाळांचे स्थलांतर रद्द करावे, अशी मागणी पालकांनी प्रकल्पाधिका:यांसमोर केली. पालकांनी मागणी मान्य होई पावेतो ठिय्या मागे न घेण्याचा          प्रवित्रा घेतल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी स्थलांतराविषयी पालक व अधिका:यांची समिती नियुक्त करून ही समिती जागेची प्रत्यक्ष पाहणी केल. त्यानंतरच स्थलांतराचा निर्णय घेतला जाईल. मात्र शाळा जुन्या ठिकाणीच            पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आदिवासी अधिकार मंचचे दयानंद चव्हाण, मोग्या भिल, नवनाथ ठाकरे, अंजू पाडवी, जगन मोरे, आटूबाई वसावे, सुनील पाडवी, कृष्णा पाडवी, कालूसिंग ठाकरे आदींसह पालक सहभागी झाले होते.