शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पुराच्या पाण्यापासून मिळणार संरक्षण : सरदार सरोवर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:43 IST

घराचा पाया बांधकामासाठी प्रकल्प बाधितांना निधी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या जिल्ह्यातील 12 पुनर्वसाहतीमधील 1 हजार 736 लाभाथ्र्याना घराच्या पायासाठी नर्मदा विकास विभागाने साधारण 10 कोटींचा निधी मंजूर केला आह़े त्यामुळे या वसाहतधारकांचे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळणार आह़े दहा वर्षानंतर का होईना शासनाने विस्थापितांची मागणी पूर्ण केल्याने  समाधान व्यक्त केले आह़े महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या साधारण साडेचार हजार प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन जिल्ह्यातील देवमोगरा, नर्मदानगर, देवानगर, सरदारनगर, रोझवा पुनर्वसन, गोपाळपूर, त:हावद, वडघील, वाडी, कायर्दे आदी 12 वसाहतींमध्ये करण्यात आले आह़े तथापि सदर विस्थापितांच्या घरास पक्का पाया नसल्याने त्यांना नेहमीच पावसाळ्यात नदीच्या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत असतो़ कारण पुराचे पाणी घरात शिरत असल्याने त्यांचे अन्नधान्याबरोबरच संसारउपयोगी वस्तूंचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत अस़े अलीकडच्या पाच वर्षापासून तर ही समस्या अधिकच बिकट होत होती़ त्यामुळे साहजिकच वसाहतींची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी पाहणा:या नर्मदा विकास विभागाकडे निधीबाबत सातत्याने मागणी करण्यात आली होती़ यासाठी विस्तापितांना धरणे, मोर्चे आदी पध्दतीने आंदोलने करावी लागली होती़ या प्रकरणी जिल्हा प्रशासन व संबंधित नर्मदा विकास विभागाने 1 हजार 736 लाभार्थीच्या 17 कोटी 18 लाख 64 हजार रुपयांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या वर्षी शासनाकडे पाठविला होता़ शिवाय निधीबाबत सातत्याने पाठपुरावाही केला होता़ या पाश्र्वभूमिवर नर्मदा विकास विभागास त्यातून साधारणत 10 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आह़े या विभागानेही त्यातील अर्धी रक्कम म्हणजे प्रत्येक लाभार्थीस 49 हजार रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले आह़े गेल्या दहा वर्षानंतर का असेना शासनाने विस्थापितांना घराच्या पायाची रक्कम उपलब्ध करुन दिल्यामुळे बाधितांच्या चेह:यावर हास्य खुलले आह़े पुराच्या पाण्याची मोठी बिकट समस्या विस्थापितांसमोर निर्माण झाली होती़ दरम्यान, गौण खनिज अर्थात वाळूबाबत शासनाने अनेक जटील अटी लागू केल्यामुळे महसूल प्रशासनाकडूनही शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जात आह़े कारवाईच्या भितीपोटी ठेकेदारांनीसुध्दा वाळू वाहतूक थांबविली आह़े परिणामी बांधकामेही ठप्प झाली आहेत़ वाळू मिळत नसल्याने हा व्यवसायच प्रभावित झाला आह़े नर्मदा विकास विभागाने प्रकल्पग्रस्तांना घराच्या पायासाठी रक्कम उपलब्ध करुन दिली असली तरी त्यांच्यापुढे वाळूचा मोठा प्रश्न निर्माण झाला आह़े कारण वाळूच मिळत नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी घराचा पाया कसा पूर्ण होईल? अशी व्यथा काही प्रकल्प बाधितांकडून विचारण्यात येत आह़े वाळू मिळाली नाही तर यंदाही पुराचा सामना करावा लागेल अशी भितीही व्यक्त करण्यात येत आह़े काही प्रकल्पग्रस्तांनी वाळूसाठी येथील महसूल प्रशासनाचे भेटही घेतली होती़ मात्र त्यातून अजूनही मार्ग निघाला नसल्याची माहिती आह़े गेल्या आठवडय़ातही वाळूसाठी तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदारांना साकडे घातले होत़े