शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:56 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय वनमंत्रालयाकडे अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती आह़े  पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट लक्कडकोट येथून झाली आहे. गुजरात हद्दीलगत तालुक्याच्या सिमावर्ती पश्चिम भागात वनसंपदेची पूवार्पार होत आलेली हानी गत 10 वर्षांत भरुन निघाली आहे. यातून येथे सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात वनसंपदा बहरली आहे. वनसंरक्षण समित्या सक्षमपणे कामे करुन जंगलाचा सांभाळ करीत आल्याने वनांचे वास्तविक स्वरुप आता पुन्हा नव्याने समोर येत आहे. तडस, बिबट, रानडुक्कर, मोर, ससे, वानर, कोल्हे यांच्यासह इतर असंख्य प्राण्यांचा वावर लक्कडकोट ते चरणमाळ घाटातील प्रतापपूर वनक्षेत्र व डांग जिल्ह्यातील लगतच्या भागात दिसून आले आह़े या क्षेत्रात वनसंपदा वाढीस आली आहे. लगतच्या गुजरात वन हद्दीत सुबीर, काकशाळा व मलंगदेव या सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रात जंगलाचा सांभाळ सुनियोजित पध्दतीने झाला असल्याने दोन राज्यांचा हा सीमावर्ती भाग वनसंपदेने बहरला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे भर ऊन्हातही तग धरुन असल्याने जंगलात वास्तव्य करणा:या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होत आली आहे. दोन राज्यांचा सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र राखीव वन क्षेत्र असुन राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित होण्यास येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात वास्तव्य करणा:या प्राण्यांना हक्काचे स्थान मिळण्यासह त्यांच्या वास्तव्यामुळे मनुष्यास निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदतच होणार आहे. शिवाय वनसंपदेचे रक्षण करणेही सोयीचे ठरु शकेल.