शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रेशनवाटपच्या बायोमेट्रिकची मुदत संपत असल्याने निर्माण होणार समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या नागरी पुरवठा विभागाने शिधा पत्रिकाधारकांचा थंब ऐवजी संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या नागरी पुरवठा विभागाने शिधा पत्रिकाधारकांचा थंब ऐवजी संबंधित दुकानदारांच्या बायोमेट्रीकवरील थंबने रेशनमाल कार्डधारकास देण्यात येत आहे. तथापि त्याची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्याचा कालावधी वाढविण्याबाबत शासनस्तरावर कुठलीही हालचाली होत नसल्यामुळे दुकानदारांबरोबर शिधा पत्रिकाधारकही संभ्रमात आहेत. सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसागणिक प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर शासनानेदेखील तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कोरोना या जीवघेण्या महामारीने गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात शिरकाव केल्यानंतर त्याच्या रूग्णसंख्येत लाखोंच्या संख्येने वाढ झाली आहे. दिवसागणिक हजारो रूग्ण वाढत आहे. राज्य शासन त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानेदेखील गेल्या मार्च महिन्यांपासून बायोमेट्रीकवरील पोस मशीनवर शिधापत्रिकाधारकांना रेशनचा माल देताना कार्डधारक ऐवजी संबंधित दुकानदारांच्या थंबचे नियोजन केले आहे. त्यामुळे गेल्या चार - साडेचार महिन्यापासून अशाच पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना रेशनचा माल दिला जात आहे. तोही अगदी पारदर्शी व पुरेसा प्रमाणात नियमानुसार दिला जात आहे. तळोदा तालुक्याततरी धान्यवितरण सुरळीतपणे दिले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. परंतु या पद्धतीची मुदत या महिन्या अखेरीस म्हणजे ३१ जुलैला संपत आहे. शिवाय महिना संपायला केवळ पाच ते सहा दिवस उरले आहेत. असे असताना त्याचा कालावधी वाढविण्याबाबत शासन व संघटनांच्या कुठल्याच हालचाली होत असताना दिसून येत नसल्याने पुढील रेशनचा माल ग्राहकांना कसा द्यावा याबाबत ग्राहकांबरोबरच दुकानदारांमध्ये संभ्रमता पसरली आहे. वास्तविक केंद्र व राज्य शासन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर समाजातील गरीब घटकातील गरजू कुणीही अन्न धान्यापासून वंचित राहू नये म्हणून विना मूल्य धान्य देत आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत, अशा कुटुंबांकरीता प्रशासन मोहीम राबवून त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देत आहे. साहजिकच या मोहिमेमुळे गरीब कुटुंबांना कार्डदेखील उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाबाबत समाधानही व्यक्त केले आहे. परंतु पॉश यंत्रावरील थंबची मुदत वाढविण्याबाबतही ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आधिच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्यातच थंबच्या धोरणाबाबत यंत्रणेने उदासिन भूमिका घेतली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. एका दुकानदाराकडे १०० पासून तर ४०० शिधापत्रिका संख्या आहे. आता शिधापत्रिकाधारकांना पुढील महिन्याचे रेशनचे धान्य देण्याचे नियोजन पुरवठा शाखेला करावे लागणर आहे. त्यामुळे वितरणाबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निदान लोकप्रतिनिधींनी तरी कोरोनाची साथ संपेपर्यंत या पद्धतीची कायमस्वरूपी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आहे.राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन धान्याचे वितरण सुरळीत, पारदर्शी, पुरेशा प्रमाणात शिधापत्रिकाधारकांना व्हावे यासाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रेशनचा काळाबाजार थांबविण्यास यंत्रणेला यश आले असले तरी या यंत्राची देखभाल व दुरूस्ती संबंधित कंपनीकडून होत नसल्यामुळे त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड संबंधित दुकानदारांना सहन करावा लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. वास्तविक सातपुड्यातील ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटीच्या समस्यांना प्रचंड तोंड द्यावे लागत असताना त्यातून मार्ग काढत हे दुकानदार ग्राहकांना बायोमेट्रीक पद्धतीनेच धान्य वितरीत करीत आहेत. पोश यंत्राशी असलेल्या साहित्याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. कुठे बॅरटी चार्जिंग होत नाही, कुठे रेंज मिळत नाही. त्यासाठी दुकानदारांना राऊटर घ्यावे लागले आहे. वास्तविक पॉश यंत्राची नियमितपणे दुरूस्ती, देखभाल होणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे पुरवठा करणाऱ्या कंपनीचे फावले आहे.