शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

आठ गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघातील आठ गावांना ३३ के.व्ही. उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे दाखल करण्यात आला असून, ...

तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघातील आठ गावांना ३३ के.व्ही. उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे दाखल करण्यात आला असून, त्यास तत्त्वतः मान्यतादेखील मिळाल्याचे समजते. साहजिकच यामुळे त्या परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शहादा-तळोदा तालुक्यातील गणोर, बामखेडा, सावखेडा, चांदसैली, रामपूर, कळंबू, धनापूर व रेवानगर अशा आठ गावांमध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. कारण तेथे आहे त्या उपकेंद्रांवर बहुसंख्य शेतकऱ्यांचे कृषी पंप व गावांचा अतिरिक्त भार असल्याने सातत्याने तांत्रिक बिघाड आणि ट्रान्सफॉर्मर जळण्याचा प्रकार घडत असतो. यामुळे खंडित वीजपुरवठ्यास शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेअभावी शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आपल्या परिसराचा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा यासाठी तेथील शेतकऱ्यांनी मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांना साकडे घातले होते. गावकरी व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार पाडवी यांनी सदर गावांच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रांचा प्रस्ताव युद्धपातळीवर तयार करून सबंधित विभागाकडे स्वतः दाखल केला आहे. त्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करीत असून, या प्रस्तावास तत्त्वतः मान्यतादेखील मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक उपकेंद्रास एक कोटी असा सव्वा आठ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. धनपूर, रेवानगर, सावखेडा, रामपूर, चांदसैली, गनोर या गावांना आदिवासी विकास विभागाकडून तर कळंबू व बामखेडा येथे ऊर्जा विभागाकडून निधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले, असे असले तरी यंत्रणांनीदेखील तत्काळ कार्यवाही करून या उपकेंद्रांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिल वसुलीची रक्कम गावातील वीज समस्येवर

वीज बिल वसुलीतून मिळालेली रक्कम त्या त्या गावामधीलच विजेची समस्या सोडविण्यासाठी ती रक्कम खर्च करण्याची मुभा शासनाने दिली आहे. परंतु त्याचे नियोजन स्थानिक आमदारांच्या माध्यमातून त्याचे नियोजन करण्याचे सांगितले आहे. यामुळे तेथील वीज प्रश्न सोडविण्यास मदत होत असून, वीजपुरवठा देखील सुरळीत होत आहे. शिवाय वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरण्यास शेतकरी पुढे येत आहे. विशेषत: तळोदा-शहादा तालुक्यातील शेतकरी शासनाच्या या उपक्रमाच्या मोठा फायदा घेत आहेत. शिवाय समाधानही व्यक्त करीत आहेत.

उत्पादनात येतेय घट

ज्या गावांच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. तेथील सहा गावे आदिवासी उपयोजना क्षेत्रात मोडतात. म्हणजे शंभर टक्के आदिवासी शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी उधार, उसनवार, बँका, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन कसेबसे शेतात कृषी पंप बसविले आहेत. साहजिकच थोडे क्षेत्र असताना ऊस, केळी, पपई अशा नगदी पिकांकडे वळले आहेत. मात्र विजेच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. कारण पिकांसाठी प्रचंड खर्च करून केवळ पुरेशा पाण्याअभावी उत्पादनात घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. आधीच दोन वर्षांपासून पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तो भरून काढण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करीत असतो. तथापि खंडित वीज पुरवठ्याने त्याचे प्रयत्न फोल ठरत असल्याची व्यथा शेतकरी यांनी मांडली आहे. निदान पिकांना पुरेसे पाणी मिळण्याकरिता ३३ के.व्ही. उपकेंद्रांचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे.

शहादा-तळोदा मतदार संघातील आठ गावांचा ३३ के.व्ही. उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यासाठी संबंधितांकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता मिळाली असून, निधीदेखील लवकरच मिळणार आहे. त्यामुळे तेथील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

- आमदार राजेश पाडवी. शहादा-तळोदा मतदार संघ.