शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

खाजगी वाहनांना मोकळ्या जागेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोलगी ता.अक्कलकुवा येथे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दाटी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोलगी ता.अक्कलकुवा येथे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दाटी होऊ लागली आहे. या दाटीमुळे परिसरातील खाजगी वाहनधारकांना वाहन लावण्यासाठी अपेक्षित जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही वाहने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात लावली जात आहे. यासाठी तेथे मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.धडगाव व मोलगी परिसरातील प्रमुख दोन बाजारपेठेपैकी एक असल्याने मोलगी शहराला महत्व प्राप्त झाले आहे. दिवसेंदिवस व्यावसायिकांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. या पाठोपाठ दुचाकी व चारचाकी वाहनांचा देखील वापर वाढला आहे. अशा या सर्व बाबींच्या तुलनेत मोलगी शहरातील जागेचा कुठलाही विस्तार झाला नाही. त्यामुळे तेथे कमालीची दाटी होऊ लागली आहे. मोलगीसह परिसरातील वाहनधारकांची संख्या वाढली असून कामानिमित्त मोलगीत येणाऱ्या वाहनधारक व खाजगी वाहतुक करणाºया वाहनेही वाढली आहे. खेडे व शहरातील ही सर्व वाहने शहरात एकत्र झाल्यास तेथे मोठी दाटी निर्माण होत आहे.मोलगी येथील मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे हा रस्ता पादचाऱ्यांनाच अपुरा पडतो. तर वाहने लावण्यासाठी अपेक्षित जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुतांश खाजगी वाहनधाकांकडून मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वाहने लावण्यात येत आहे. या वाहनांमुळे रुग्णालयातील आरोग्य सेवावर कुठलाही परिणाम तर झाला नाही, त्यात शंका नाही. परंतु परिणाम होणार नसल्याचेही सांगता येणार नाही. म्हणून अशी समस्या निर्माण होण्याआधीच या वाहनांसाठी मोलगीत वाहनधारकांच्या अपेक्षेनुसार मोकळी जागा उपलब्ध होणे आवश्यक असून नागरिकांकडून तशी मागणी होत आहे.मोकळी जागा उपलब्ध झाल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात लागणारी वाहनेही मोकळ्या जागेतच लावले जातील. कामानिमित्त मोलगीत येणाºया नागरिकांनाही मोकळा श्वास घेता येईल. एवढेच नव्हे तर तेथील नागरिक व व्यावसायिकांच्या दैनंदिन कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही.

४अक्कलकुवा तालुक्याच्या एकुण क्षेत्रफळापैकी ८० टक्के क्षेत्र हे मोलगी तथा दुर्गम भागात येते. तशी लोकसंख्या देखील मोलगी भागातच अधिक आहे. अक्कलकुवा हे तालुका प्रशासकीय कामकाज व कार्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे मोलगी भागातील बहुसंख्य नागरिकांना या कामांसाठी अक्कलकुवा गाठावे लागतले. शिवाय प्रशासकीय यंत्रणा लांब पडत असल्यामुळे मोलगी भागाचा अपेक्षेनुसार विकासही झाला नाही. नागरिकांची प्रशासकीय कामे वेळेवर व्हावी, विकास कामांवर जवळून नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मोलगीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी काही वर्षापासून करण्यात येत आहे.४मोलगी हा नवीन तालुका निर्मितीसाठी नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रशासनामार्फत प्रस्तावही मंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर जानेवारी २०१५ मध्ये वनपट्टे वाटप व अन्य विकास कामांसाठी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव हे पिंपळखुटा ता.अक्कलकुवा येथे आले होते. राव यांच्या दौऱ्यात मोलगी तालुक्याची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा अवघ्या दुर्गम भागातील नागरिकांमार्फत करण्यात आली. परंतु प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे तालुक्याचा प्रश्न रखडला. राव यांच्या दौºयानंतर तालुका निर्मितीचा कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप अंधातरीच राहिला आहे.या भागात शासनामार्फत अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु या सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी अपेक्षित यंत्रणा तेथे कार्यान्वित करण्यात आली नाही. शिवाय प्रशासकीय सेवेवर कुठलेही नियंत्रण ठेवण्यात येत नाही, त्यामुळे हा भाग नेहमीच उपेक्षित ठरत आला आहे. त्यात प्रामुख्याने दूरसंचार विभागाच्या सेवेवर बोट ठेवले जात आहे. यासह अन्य सविधा व योजनांची अंमलबजावणी वेळेवर व अपेक्षेनुसार होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.