शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शाळा, महाविद्यालयांसह खाजगी क्लासेसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी काढले आहेत. दरम्यान, ग्रामिण भागातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत.कोरोनाची भितीमुळे शाळा, महाविद्यालयांधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. या आजाराची साथ अधीक पसरू नये यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमीत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, खाजगी व सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच खाजगी स्वरूपात घेण्यात येणारे सर्व क्लासेस हे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.या काळात दहावी व बारावीच्या पूर्व निर्धारित परीक्षा सुरू राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमधील कार्यालयीन कामकाज देखील नियमित सुरू राहणार आहे. खाजगी क्लास चालकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रविवार, १५ रोेजी दुपारी काढले.यामुळे शाळांनी लागलीच आपापल्या सोशल मिडिया गृपवर ही बाब विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.सिनेमागृहे देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वच शासकीय, निमशासकीय सार्वजनिक कार्यक्रम या काळात रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान, नागरिकांनी या साथरोगासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनी योग्य त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. दक्षता घेतली जात आहे.४३१ मार्च पर्यंत शाळांना सुट्टीचा निर्णय हा आश्रमशाळांबाबत लागू केला नाही. शहरी व ग्रामिण भागात आश्रमशाळा आहेत. तेथे शेकडो विद्यार्थी एकत्र राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांबाबत दक्षता पाळण्याच्या ुसुचना यापूर्वीच आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आपल्या आश्रमशाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.४शहरी भागातील होस्टेल मात्र ओस पडण्याची शक्यता आहे. कारण शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे वसतिगृहे देखील खाली होणार आहेत. त्यामुळे आश्रम शाळांबाबतच्या निर्णयाकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.