शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शाळा, महाविद्यालयांसह खाजगी क्लासेसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना अर्थात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी काढले आहेत. दरम्यान, ग्रामिण भागातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत.कोरोनाची भितीमुळे शाळा, महाविद्यालयांधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. या आजाराची साथ अधीक पसरू नये यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमीत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, खाजगी व सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच खाजगी स्वरूपात घेण्यात येणारे सर्व क्लासेस हे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.या काळात दहावी व बारावीच्या पूर्व निर्धारित परीक्षा सुरू राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमधील कार्यालयीन कामकाज देखील नियमित सुरू राहणार आहे. खाजगी क्लास चालकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रविवार, १५ रोेजी दुपारी काढले.यामुळे शाळांनी लागलीच आपापल्या सोशल मिडिया गृपवर ही बाब विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.सिनेमागृहे देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वच शासकीय, निमशासकीय सार्वजनिक कार्यक्रम या काळात रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान, नागरिकांनी या साथरोगासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनी योग्य त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. दक्षता घेतली जात आहे.४३१ मार्च पर्यंत शाळांना सुट्टीचा निर्णय हा आश्रमशाळांबाबत लागू केला नाही. शहरी व ग्रामिण भागात आश्रमशाळा आहेत. तेथे शेकडो विद्यार्थी एकत्र राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांबाबत दक्षता पाळण्याच्या ुसुचना यापूर्वीच आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आपल्या आश्रमशाळा व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत.४शहरी भागातील होस्टेल मात्र ओस पडण्याची शक्यता आहे. कारण शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे वसतिगृहे देखील खाली होणार आहेत. त्यामुळे आश्रम शाळांबाबतच्या निर्णयाकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे.