भारतात राष्ट्रीय एकता व अखंडता,वैचारिक श्रेष्ठता व स्वतंत्रता, सामाजिक बंधूभाव,चारित्रिक व अध्यात्मिक उत्कर्ष, अनुशासित लोकतंत्राची भावना,श्रमप्रतिष्ठा या उद्दिष्टांवर आधारित भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना सन १९६९ ला राम नवमीच्या दिवशी राष्ट्रीय पातळीवरील २५ शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात झाली. राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्वानांचा सहभाग असलेल्या भाशिमंचे कार्य आज पूर्ण देशात विस्तारले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या भाशिमंच्या कार्यकारिणीची घोषणा देवगिरी प्रांत कार्यवाह प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर व प्रांत अध्यक्ष प्रा. सर्जेराव ठोंबरे यांनी केली आहे.नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शंकरराव पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. विजयप्रकाश ओमप्रकाश शर्मा यांची निवड करण्यात आली असून उर्वरित नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- द्वितीय उपाध्यक्ष राम दाऊतखाने,कार्यवाह आशिष वाणी,सहकार्यवाह रुपेश देवरे, कोषाध्यक्ष महेश जोशी व मंगेश उपासनी,महिला प्रमुख चेतना चौधरी व भावना पटेल, शालेय प्रकल्प प्रमुख आशिष सोनार व सुषमा फुलम्बरीकर, प्रकाशन विभाग प्रमुख अरुण कायस्थ व चंद्रशेखर पाटील, गुरुकुल आश्रम प्रमुख गीतांजली शिंदे व अर्चना धुमाळ, अनुसंधान आयाम प्रमुख डॉ.नरेंद्र गोसावी व प्रा. डॉ. मयूर ठाकरे, शैक्षिक प्रकोष्ठ प्रमुख प्रा. डॉ. मधुकर देसले व प्रा. मीना हजारी, युवा आयाम प्रमुख रविंद्र गुरव व सौ. सोनाली पाडवी यांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्हा नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील,इंजि.पी. आर. पाटील,भाशिमंचे प्रांत सहकार्यवाह प्रा. डॉ. उमेश शिंदे, प्रांत पदाधिकारी पंकज पाठक,क .ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील आदींनी केले आहे.