शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

अशैक्षणिक कामांच्या बोझ्याखाली दबला प्राथमिक शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार : जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी वळू लागले आहेत. गुणवत्तावाढीसह डिजिटल शाळा उपक्रम, हसत खेळत ...

नंदुरबार : जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी वळू लागले आहेत. गुणवत्तावाढीसह डिजिटल शाळा उपक्रम, हसत खेळत शिक्षण आदी विविध माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामांचा व्याप मात्र कमी झालेला नाही. दिवसेंदिवस हा व्याप अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक दबला जात आहे.

जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याची कसरत करावी लागते. त्यातच गुणवत्ता वाढ करणे, शाळाबाह्य शिक्षकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे आदी कामे करावी लागतात. गुणवत्तेचा दर्जा टिकविण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी अधिकारी वर्गाकडून नेहमीच दबाव असतो. अशा स्थितीत शिक्षकांना अशैक्षणिक कामांना देखील सामोरे जावे लागते. त्यात जाणारा वेळ लक्षात घेता त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होत असतो. त्यामुळे अशैक्षणिक कामे कमी करणे आवश्यक आहे.

द्विशिक्षकी शाळांना अडचणी...

जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा नाहीत. ज्या ठिकाणी द्विशिक्षकी शाळा आहेत तेथे तर अशैक्षणिक कामे करताना शिक्षकांना अडचणी येतात. अशैक्षणिक कामासाठी एक शिक्षक व्यस्त राहिल्यास दुसरा शिक्षक एक ते चार वर्ग शिकवतो. त्यातच जर द्विशिक्षकी शाळेत जर दोन्ही महिला शिक्षिका राहिल्या तर अडचणी आणखी वाढतात. अशावेळी संबंधित शिक्षकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सोपविलेल्या अशैक्षणिक कामांना प्रथम प्राधान्य द्यावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापनावरही परिणाम होतो.

योजनांचे ओझे...

n जिल्हा परिषद शिक्षकांना २६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षकांना अडकून राहावे लागते.

n मतदार नोंदणी, मतदानाच्या वेळी मतदार स्लिपा वाटणे, जनगणना, वेळोवेळी येणारे इतर सर्वेक्षण करणे यासह इतर कामे असतात.

n शालेय वर्गखोली, शौचालय बांधकाम, पोषण आहार वाटप, शिष्यवृत्ती वाटप यासह इतर अनेक कामे असतात.

n शाळा डिजिटल करणे, विविध शैक्षणिक प्रशिक्षण यांना उपस्थित राहणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणणे, त्यांचे सर्वेक्षण करणे आदी कामांचाही समावेश आहे.

गुणवत्ता वाढीसाठी एकीकडे शिक्षक प्रयत्न करतात. दुसरीकडे मात्र अशैक्षणिक कामाचा बोजा असतो. शासनाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. जर अशैक्षणिक बोजा कमी झाला तर शिक्षकांनाही ते सोयीचे होईल. -रामकृष्ण बागल,

राज्य कार्यकारिणी सदस्य, शिक्षक परिषद.

शासनाच्या आदेशान्वये नेहमीच शिक्षक कामे करतात. ते आमचे कर्तव्यच आहे, परंतु शैक्षणिक सत्राच्या काळात अशा कामांचा बोजा कमी केला जावा. तसे झाल्यास शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रीत करता येईल. त्यादृष्टीने विचार व्हावा. -अशोक देसले,

जिल्हा सरचिटणीस,अखिल प्राथमिक शिक्षक संघ.