शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याचा अभिमान- पालकमंत्री रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:49 IST

उपक्रम : सहभागी शाळा संस्थांचा झाला गौरव

नंदुरबार : तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याची बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गौरव समारंभात बोलतांना केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब, रोटरी क्लब नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जगात तिसरा तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून नोंद होणार आहे. त्यानिमित्त या उपक्रमात योगदान देणा:यांचा गौरव समारंभाचे मंगळवारी नाटय़गृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी आर.डी.कांबळे, डॉ.राहुल चौधरी, बी.आर.रोकडे, सलाम मुंबईचे अजय पिळणकर, रोटरीचे शब्बीर मेमन, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, हैदर नुराणी, डॉ.तेजल चौधरी आदी उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले, मं.गांधी हे जगातील मोठमोठय़ा व्यक्तींचे प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान निश्चितच यशस्वी होईल. स्वच्छता मोहिमेबरोबरच तंबाखूमुक्त मोहिम राबविण्यात आली असून आज जिल्हा तंबाखुमुक्त शाळांचा जगात तिसरा जिल्हा ठरला असल्यामुळे ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी सर्वाच्या परिश्रमामुळे जिल्हा तंबाखुमुक्त झाला. जिल्हाधिका:यांनी पुढाकार घेवून ही बाब शक्य करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक हजार 785 शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याचे नाव राज्यात निघत आहे. आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्येही हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत देखील आता सर्वानी सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन रणजीत राजपूत, डॉ.माधव कदम, वसंत पाटील यांनी केले.