शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याचा अभिमान- पालकमंत्री रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:49 IST

उपक्रम : सहभागी शाळा संस्थांचा झाला गौरव

नंदुरबार : तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याची बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गौरव समारंभात बोलतांना केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब, रोटरी क्लब नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जगात तिसरा तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून नोंद होणार आहे. त्यानिमित्त या उपक्रमात योगदान देणा:यांचा गौरव समारंभाचे मंगळवारी नाटय़गृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी आर.डी.कांबळे, डॉ.राहुल चौधरी, बी.आर.रोकडे, सलाम मुंबईचे अजय पिळणकर, रोटरीचे शब्बीर मेमन, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, हैदर नुराणी, डॉ.तेजल चौधरी आदी उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले, मं.गांधी हे जगातील मोठमोठय़ा व्यक्तींचे प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान निश्चितच यशस्वी होईल. स्वच्छता मोहिमेबरोबरच तंबाखूमुक्त मोहिम राबविण्यात आली असून आज जिल्हा तंबाखुमुक्त शाळांचा जगात तिसरा जिल्हा ठरला असल्यामुळे ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी सर्वाच्या परिश्रमामुळे जिल्हा तंबाखुमुक्त झाला. जिल्हाधिका:यांनी पुढाकार घेवून ही बाब शक्य करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक हजार 785 शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याचे नाव राज्यात निघत आहे. आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्येही हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत देखील आता सर्वानी सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन रणजीत राजपूत, डॉ.माधव कदम, वसंत पाटील यांनी केले.