शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

व्यापा-यांच्या वाहतूक खर्चावरुन दिला जातो शेतक-यांच्या धान्याला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:23 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शासनाकडून भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरीही शेतकरी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शासनाकडून भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरीही शेतकरी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे प्राधान्याने धान्याची विक्री करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा हा माल मात्र हमीभावाने खरेदी होत नसल्याचे समोर आले आहे. यातून कोणत्याही शेतकऱ्याला धान्य विक्री केल्यानंतर हमीभावाने पैसेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नंदुरबार बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त बाजार समित्यांपैकी एक आहे. रब्बी हंगामात गहू, मिरची आणि खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य यांसह विविध धान्य मालांची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी येथे हजेरी लावतात. परंतु या शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेला हमीभावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून धान्य उचल करणारे मोठे व्यापारी त्यांच्या वाहतूक, बारदान आणि मार्केट फीवरून दर ठरवत असल्याने येथील व्यापाऱ्यांचा नाईलाज होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात शासनाकडून केवळ एफएक्यू दर्जा असलेले धान्यच खरेदी केंद्रावर खरेदी केले जात असल्याने डागी व काळा पडलेला माल मातीमोल दरात व्यापारी खरेदी करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना लागणारी मार्केट फी, बारदान, तोलाई आदींची वसूलही शेतकऱ्यांकडूनच होते. 

 बाजाराचे दर वेगळेच  शासनाकडून ज्वारीला किमान २ हजार ६४० रूपये प्रतीक्विंटल, बाजरी २ हजार १५० रूपये तर मका १ हजार ८५० रूपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.  परंतू शासनाने ठरवून दिलेल्या दरांमध्ये व्यापारी मालच खरेदी करत नसल्याचे बाजार समितीत दिसून येत आहे. 

   हे आहेत आजचे भाव   बाजारात व्यापा-यांकडून चांगली ज्वारी १ हजार ६५० ते ८०, काळी पडलेली ज्वारी साधारण १ हजार १००, बाजरी १ हजार ते १ हजार ३०० तर मका १ हजार ३०० रूपयांपासून खरेदी करण्यात येतो.  बाजार समिती शेतक-यांकडून एक रूपयाही घेत नाही. मात्र व्यापा-यांकडून मार्केट फी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

दरांवर नियंत्रण नाहीच : बाजार समितीत होणा-या दरांच्या निर्धारणाबाबत कोणाचेही नियंत्रण नसल्याची माहिती आहे. बाहेरील व्यापा-यांच्या दरांवरून येथे धान्याची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

सरकारने जाहिर केलेला हमीभाव जाहिर करुनही त्यांचा शेतमाल त्या भावाने खरेदी होत नाही. यामुळेच शेतक-यांनी आंदोलन केले आहे. शेतमाल हमीभावानुसार खरेदी व्हायला हवा. बाजार समित्यांनीही याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी बाजारात माल घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च करतो. माल विक्री करताना मात्र वाहतूक खर्चही वसूहोत नसल्याचे प्रकार घडतात.          -जयसिंग माळी,शेतकरी, मोड. तळोदा.