शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

व्यापा-यांच्या वाहतूक खर्चावरुन दिला जातो शेतक-यांच्या धान्याला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:23 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शासनाकडून भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरीही शेतकरी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शासनाकडून भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरीही शेतकरी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे प्राधान्याने धान्याची विक्री करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा हा माल मात्र हमीभावाने खरेदी होत नसल्याचे समोर आले आहे. यातून कोणत्याही शेतकऱ्याला धान्य विक्री केल्यानंतर हमीभावाने पैसेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नंदुरबार बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त बाजार समित्यांपैकी एक आहे. रब्बी हंगामात गहू, मिरची आणि खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य यांसह विविध धान्य मालांची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी येथे हजेरी लावतात. परंतु या शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेला हमीभावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून धान्य उचल करणारे मोठे व्यापारी त्यांच्या वाहतूक, बारदान आणि मार्केट फीवरून दर ठरवत असल्याने येथील व्यापाऱ्यांचा नाईलाज होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात शासनाकडून केवळ एफएक्यू दर्जा असलेले धान्यच खरेदी केंद्रावर खरेदी केले जात असल्याने डागी व काळा पडलेला माल मातीमोल दरात व्यापारी खरेदी करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना लागणारी मार्केट फी, बारदान, तोलाई आदींची वसूलही शेतकऱ्यांकडूनच होते. 

 बाजाराचे दर वेगळेच  शासनाकडून ज्वारीला किमान २ हजार ६४० रूपये प्रतीक्विंटल, बाजरी २ हजार १५० रूपये तर मका १ हजार ८५० रूपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.  परंतू शासनाने ठरवून दिलेल्या दरांमध्ये व्यापारी मालच खरेदी करत नसल्याचे बाजार समितीत दिसून येत आहे. 

   हे आहेत आजचे भाव   बाजारात व्यापा-यांकडून चांगली ज्वारी १ हजार ६५० ते ८०, काळी पडलेली ज्वारी साधारण १ हजार १००, बाजरी १ हजार ते १ हजार ३०० तर मका १ हजार ३०० रूपयांपासून खरेदी करण्यात येतो.  बाजार समिती शेतक-यांकडून एक रूपयाही घेत नाही. मात्र व्यापा-यांकडून मार्केट फी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

दरांवर नियंत्रण नाहीच : बाजार समितीत होणा-या दरांच्या निर्धारणाबाबत कोणाचेही नियंत्रण नसल्याची माहिती आहे. बाहेरील व्यापा-यांच्या दरांवरून येथे धान्याची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

सरकारने जाहिर केलेला हमीभाव जाहिर करुनही त्यांचा शेतमाल त्या भावाने खरेदी होत नाही. यामुळेच शेतक-यांनी आंदोलन केले आहे. शेतमाल हमीभावानुसार खरेदी व्हायला हवा. बाजार समित्यांनीही याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी बाजारात माल घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च करतो. माल विक्री करताना मात्र वाहतूक खर्चही वसूहोत नसल्याचे प्रकार घडतात.          -जयसिंग माळी,शेतकरी, मोड. तळोदा.