शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘सातपुडा’तर्फे उसाला 2,315 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 रुपये प्रती मेट्रीक टन भाव देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी        जाहीर केले. सातपुडा साखर कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, चेअरमन दीपक पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, माधव पाटील, हैदरअली नुरानी, दरबारसिंग पवार, चैतन्य अकोलकर, भाजपचे शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, डॉ.किशोर पाटील आदी उपस्थित होते. दीपक पाटील पुढे म्हणाले की, कारखाना सुरळीतपणे सुरू असून सभासदांनी कारखान्यास आपला सगळा ऊस पुरविण्याचे आवाहन केले. कारखान्याचे सर्व विभाग ऑटोमायङोशन झाल्याने तसेच सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने कोणाचीही फसवणूक होणार नाही. परिसरातील शेतकरी मोठा झाला पाहिजे, जगला पाहिजे व त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे या उद्देशाने स्व.पी.के. अण्णांनी तालुक्यात कारखानदारी उभी केली होती. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सातपुडय़ाची वाटचाल सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या 27 हजार सभासदांपैकी केवळ सहा हजार सभासद कारखान्याला ऊस पुरवतात याकडे त्यांनी लक्ष वेधून हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. सभासद जितका जास्त ऊस कारखान्यास पुरवतील तितकाच जास्त फायदा सभासदांना होणार असल्याने सर्व सभासदांनी सर्व ऊस कारखान्यास पुरविण्याचे आवाहन केले. गेल्यावर्षी कारखान्यातर्फे ऊसाला दोन हजार 151 रूपये भाव देण्यात आला होता. यंदा कारखाना शासनाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षाही दोन रूपये जास्त म्हणजे दोन हजार 315 रुपये मेट्रीक टन एकरकमी भाव देणार असल्याचे दीपक पाटील यांनी जाहीर केले. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील शेतक:यांच्या झालेल्या नुकसानीबाबत लवकरच राज्यपालांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रय} करणार असल्याचे सांगितले. विजय चौधरी म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी काळ्या मातीशी इमान राखणा:या शेक:यांच्या कल्याणासाठी विविध संस्था उभ्या केल्याचे आणि या संस्था दीपक पाटील समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात  कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, कारखान्यातर्फे शेतक:यांना त्यांच्या शेताच्या बांधार्पयत जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. याचा शेतक:यांनी फायदा घ्यावा व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. यंदा कारखान्याकडे 14 हजार एकर उसाची नोंद झाल्याचे सांगून चार लाख टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, के.डी. पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, संपर्क अधिकारी प्रवीण पाटील, आनंदा पाटील, साखर कारखाना, सूतगिरणी, खरेदी- विक्री आदी संस्थेचे संचालक, नगरसेवक व शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  माजी मंत्री जयकुमार रावल या कार्यक्रमास उपस्थित रहाणार होते. मात्र काही कारणामुळे ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी ऑडिओ क्लिपद्वारे शुभेच्छा दिल्या.