शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘सातपुडा’तर्फे उसाला 2,315 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 रुपये प्रती मेट्रीक टन भाव देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी        जाहीर केले. सातपुडा साखर कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, चेअरमन दीपक पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, माधव पाटील, हैदरअली नुरानी, दरबारसिंग पवार, चैतन्य अकोलकर, भाजपचे शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, डॉ.किशोर पाटील आदी उपस्थित होते. दीपक पाटील पुढे म्हणाले की, कारखाना सुरळीतपणे सुरू असून सभासदांनी कारखान्यास आपला सगळा ऊस पुरविण्याचे आवाहन केले. कारखान्याचे सर्व विभाग ऑटोमायङोशन झाल्याने तसेच सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने कोणाचीही फसवणूक होणार नाही. परिसरातील शेतकरी मोठा झाला पाहिजे, जगला पाहिजे व त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे या उद्देशाने स्व.पी.के. अण्णांनी तालुक्यात कारखानदारी उभी केली होती. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सातपुडय़ाची वाटचाल सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या 27 हजार सभासदांपैकी केवळ सहा हजार सभासद कारखान्याला ऊस पुरवतात याकडे त्यांनी लक्ष वेधून हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. सभासद जितका जास्त ऊस कारखान्यास पुरवतील तितकाच जास्त फायदा सभासदांना होणार असल्याने सर्व सभासदांनी सर्व ऊस कारखान्यास पुरविण्याचे आवाहन केले. गेल्यावर्षी कारखान्यातर्फे ऊसाला दोन हजार 151 रूपये भाव देण्यात आला होता. यंदा कारखाना शासनाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षाही दोन रूपये जास्त म्हणजे दोन हजार 315 रुपये मेट्रीक टन एकरकमी भाव देणार असल्याचे दीपक पाटील यांनी जाहीर केले. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील शेतक:यांच्या झालेल्या नुकसानीबाबत लवकरच राज्यपालांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रय} करणार असल्याचे सांगितले. विजय चौधरी म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी काळ्या मातीशी इमान राखणा:या शेक:यांच्या कल्याणासाठी विविध संस्था उभ्या केल्याचे आणि या संस्था दीपक पाटील समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात  कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, कारखान्यातर्फे शेतक:यांना त्यांच्या शेताच्या बांधार्पयत जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. याचा शेतक:यांनी फायदा घ्यावा व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. यंदा कारखान्याकडे 14 हजार एकर उसाची नोंद झाल्याचे सांगून चार लाख टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, के.डी. पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, संपर्क अधिकारी प्रवीण पाटील, आनंदा पाटील, साखर कारखाना, सूतगिरणी, खरेदी- विक्री आदी संस्थेचे संचालक, नगरसेवक व शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  माजी मंत्री जयकुमार रावल या कार्यक्रमास उपस्थित रहाणार होते. मात्र काही कारणामुळे ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी ऑडिओ क्लिपद्वारे शुभेच्छा दिल्या.