शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

सातपुड्यात होलिकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होलिकोत्सव हा साधेपणाने होणार आहे. साधेपणातही होळीचा उत्साह कायम आहे. दुर्गम भागात मधुर गीते गायनाच्या ...

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होलिकोत्सव हा साधेपणाने होणार आहे. साधेपणातही होळीचा उत्साह कायम आहे. दुर्गम भागात मधुर गीते गायनाच्या सराव सुरु झाला असून सातपुड्याच्या द-या-खो-यात ढोल, डफ च्या तालावर होळी गीताच्या मधुर सुरात मुली व महिला नाचण्याच्या सरावात लागले आहे. सातपुड्यात आदिवासी बांधव परंपरागत वेशभूषेत विविध सण साजरा करतात. गावदिवाळी, इंदलपुजन, वाघदेव, भोंगर्या , खोडपुजन, ओखडा, नवाय पुजन, बारामेद्य ,गिंबदेव कणी पुजन,याहा मोगी पुजन, महाशिवरात्री,निलचारी,होळी असे पारंपरिक सणाची विधीवत पद्धतीने पूजन करून साजरे केले जातात. त्यातच होळी सणाला मोठे असुन, मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा होतो. आदिवासी बोली भाषेत होळी सणाला ओली महिना म्हणतात. या ओलीच्या महिन्यात साहित्याची जुळवाजुळव करीत होळी सणासाठी मागणी असणाऱ्या विविध साहित्य बनविण्यात सध्या आदिवासी बांधव व्यस्त आहेत.

अतिदुर्गम भागातील साकलीउमरचा आमराईपाडा येथे रमेश वसावे, रायसिग पाडवी, सुमना पाडवी हे बाबुंपासुन वेगवेगळ्या वस्तू तयार करत आहेत. हस्त व कला कौशल्य या निसर्गाचा देणगीचा वापर करीत होळीसाठी मोरपीसच्या टोपी विणत असतात मार्च महिन्यात होळी म्हणजे आदिवासी भाषेत ओली महिना चंन्द्र नविन दिसतात. त्या दिवसापासुन नमस्कार करीत मोरखी बनत असलेला मनुष्य समाजात कडक नियमांची पाळणी करत आहेत. सणानिमित्त पाळणी करणारे मोरखी, बावा, जनखाडोक, नागरामोरखी, व टोपी विणणारे सर्व पालन करीत असतात घरातील ज्येष्ठ आई वडील, मुले, मुली, महिला, तसेच पाळीव पक्षी ,पशुधन,यांची आरोग्याची निगा राखावी म्हणून नियमाचे पालन करीत ४५ दिवस नियमाच्या पालनीत राहुन महत्व देतात. आहारात मांसाहर वर्ज्य करतात. खाटेवर न बसता ,न स्पर्श करणे, महिलांना स्पर्श न करणे, ज्या दिवसापासून पाळणी सुरुवात झाली. त्या दिवसापासुन कोणाला वाईट न बोलणे ,चप्पल न घालणे,घरातील पाळीव पशुपक्ष्याची निगा ठेवणे, जेवण स्वत: बनवुन घेत वेगळेच राहत पाळणी करीत असतात.

साकलीउमर च्या आमराईपाडा या गावातील येथे चार पाच कारागीर एकत्र येत मोराच्या पीसापासुन टोपी विनत असून एका टोपीला विण्यात एकास तीन दिवस लागत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. तब्बल ७० काड्या टाकून एक टोपी तयार करण्यात येते. होलिकोत्सवात मोरपीस टोपीला मोठे महत्व आहे. श्रद्धेने मागणी असल्याने दुसऱ्या राज्यातुन ही टोपीला मागणी होत असते.

सातपुड्यातील होळी म्हणजे मानता,पालनी करीत श्रद्धेने नियमात पुजन करीत सातपुड्याची संस्कृती आजही टिकुन आहे. आजच्या मोबाईल युगात सातपुड्यातील गाव पाड्यांवरील नागरिकांना संबध जुडला असला तरी आपली बोलीभाषा,गीते,लोककला,संस्कृती, लोकसंगीत, हस्तकौशल्य ,वस्तुकला,कला,नुत्य,पेहराव,टिकुन आहेत.