शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने पुन्हा उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नंदुरबार बाजार समितींमध्ये व्यापा:यांनी खरेदी केलेला मका पावसात सापडल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्पांवर प्रशासनाने लक्ष ठेवले असून पाण्याची आवक वाढताच विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दुस:या दिवशीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उकाढा वाढला देखील होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. काही भागात तुरळक सरी होत्या तर अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. साधारणत: अर्धा ते पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. रात्री उशीरार्पयत पावसाची रिपरिप कायम होती. उभ्या पिकाचे नुकसानशेतात उभे असलेले कापूस, पपई, मका या पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले. तर अनेक शेतक:यांनी सोयाबीन, बाजरी व इतर पिके काढून घेतल्याने त्यांचे नुकसान टळले. परंतु शेतात झाकून ठेवलेला शेतीमालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वेचणीवर आलेल्या कापसाला सर्वाधिक फटका बसला आहे. दोन दिवसांवर वेचणीसाठी असलेला कापूस या पावसामुळे पुर्णपणे भिजला असल्याने त्याचा काहीही उपयोग राहणार नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 25 लाखांचे नुकसाननंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव प्रक्रिया बंद होती. परंतु काही शेतक:यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला होता. शेतक:यांनी आणलेला शेतीमाल व्यापा:यांनी खरेदी करावा असा आग्रह धरला. व्यापा:यांनी खरेदी करून तो खुल्या जागेत वाळत टाकण्यासाठी ठेवला. परंतु दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी केलेला जवळपास दीड हजार क्विंटल मका पाण्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले. सध्या पावसाचे वातावरण पहाता बाजार समितीतर्फे मंगळवार्पयत खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव होणार नसल्याचे जाहीर करण्यात आलेले असतांनाही काही शेतक:यांनी मका विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीने व्यापा:यांना आवाहन करून लिलाव करण्यास भाग पाडले. परंतु खरेदी केलेला मका उघडय़ावरच राहिल्याने दुपारी आलेल्या पावसात मका भिजून तो वाहून गेला. यामुळे व्यापा:यांच्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सायंकाळी पाण्यात वाहणारा मका गोळा करण्यासाठी व्यापारी व हमालांची कसरत झाली. दरम्यान, पुढील सुचना होईर्पयत शेतक:यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. व्यापा:यांचा हिरमोडपावसाची रिपरिप आणि शेतक:यांचे झालेले नुकसान याचा फटका व्यापा:यांना बसला आहे. बाजारातील उलाढाल गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंदावली आहे. शुक्रवारी तर बाजारपेठेत शुकशुकाट होता. आता तुळशी विवाहानंतर लगAसमारंभ सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापा:यांना आशा लागून आहे. परंतु वारंवारचा बेमोसमी पाऊस आणि शेतक:यांचे नुकसान यामुळे या सिझनवरही परिणाम होईल की काय अशी भिती व्यापा:यांना सतावत आहे. प्रकल्पांमधू विसर्ग सुरूजिल्ह्यातील शिवण, नागण व सुसरी प्रकल्पातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे. नदी, नाल्यांचा प्रवास सुरूच असल्याने या प्रकल्पांमधून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहेत. अनेक भागात पाऊस सुरू असल्याने पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून सद्य स्थितीत 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागन प्रकल्पातून 35 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सुसरीमधून विसर्ग सुरू नाही. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यास सुसरीचाही विसर्ग सुरू होणार आहे.  नदी, नाल्यांना पूर येवून पाणी या प्रकल्पांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग कधीही वाढविण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावर आणि नाल्यांमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते काढून घ्यावे. पाणी सुरू असतांना नदी, नाले ओलांडण्याचा प्रय} करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.