शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रकाशा बॅरेज पुन्हा ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. सिक्युरिटी गार्ड नसून लाखो रुपये खर्च करून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. शिवाय त्याचे टीव्ही स्क्रीनदेखील ठेवलेला नाही. म्हणून शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च निरुपयोगी ठरत आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून माहिती देण्यासाठीही टाळाटाळ केली जाते.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा बॅरेज महत्त्वाचा ठरतो. वैयक्तिक पाणी परवानगी घेतलेल्या शेतकºयांची जमीन सिंचनासाठी उपयोगी ठरत आहे. मात्र आजच्या स्थितीला कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेला बॅरेज रामभरोसे आहे. कारण याठिकाणी दोन वषार्पासून सिक्युरिटी गार्ड नसल्याने बॅरेजवर ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात सहा कॅमेरा आहेत पैकी दोन जम्बो कॅमेरे आहेत. मात्र एका वर्षातच म्हणजे २५ जानेवारी २०१९ ला लेन्स खराब झाली होती. म्हणून उपविभागीय अधिकारी पाटबंधारे शाखा प्रकाशा यांनी कार्यकारी अभियंता धुळे यांना पत्र लिहून येथील सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाल्याचे कळवले होते. ते दुरुस्त होत नाही तोच पाच महिन्यात ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बंद पडले आहेत. त्याला आॅपरेट करणारा कोणी नाही. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया गेल्यातच जमा आहे.बॅरेजवर सिक्युरिटी गार्ड नाही व सीसीटीव्ही बंद आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी प्रकाशा येथील बॅरेजच्या कार्यालयात संपर्क साधल्यास माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उपविभागीय अभियंता भेटत नाहीत. येथे प्रकाशा बॅरेज तापी जलविद्युत व उपसा जलसिंचन योजना विभाग क्रमांक दोनचे कार्यालय आहे. तेथे चौकशी केली असता त्यांनीही आमचा संबंध नाही, अशी उत्तरे देण्यात आली. याबाबत पाटबंधारे विभागाचे धुळे येथील कार्यकारी अभियंता दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत मला माहिती नाही. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद का आहेत याची माहिती संबंधित विभागाला विचारतो. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असताना त्याबाबत रिपोर्ट का केला नाही याविषयी चौकशी करतो, असे सांगितले.शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या प्रकाशा बॅरेजच्या सुरक्षेविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालून या बॅरेजवरील सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.