शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

प्रकाशा बॅरेज पुन्हा ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज आजच्या स्थितीला पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. सिक्युरिटी गार्ड नसून लाखो रुपये खर्च करून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. शिवाय त्याचे टीव्ही स्क्रीनदेखील ठेवलेला नाही. म्हणून शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च निरुपयोगी ठरत आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून माहिती देण्यासाठीही टाळाटाळ केली जाते.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा बॅरेज महत्त्वाचा ठरतो. वैयक्तिक पाणी परवानगी घेतलेल्या शेतकºयांची जमीन सिंचनासाठी उपयोगी ठरत आहे. मात्र आजच्या स्थितीला कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेला बॅरेज रामभरोसे आहे. कारण याठिकाणी दोन वषार्पासून सिक्युरिटी गार्ड नसल्याने बॅरेजवर ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात सहा कॅमेरा आहेत पैकी दोन जम्बो कॅमेरे आहेत. मात्र एका वर्षातच म्हणजे २५ जानेवारी २०१९ ला लेन्स खराब झाली होती. म्हणून उपविभागीय अधिकारी पाटबंधारे शाखा प्रकाशा यांनी कार्यकारी अभियंता धुळे यांना पत्र लिहून येथील सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाल्याचे कळवले होते. ते दुरुस्त होत नाही तोच पाच महिन्यात ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बंद पडले आहेत. त्याला आॅपरेट करणारा कोणी नाही. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया गेल्यातच जमा आहे.बॅरेजवर सिक्युरिटी गार्ड नाही व सीसीटीव्ही बंद आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी प्रकाशा येथील बॅरेजच्या कार्यालयात संपर्क साधल्यास माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उपविभागीय अभियंता भेटत नाहीत. येथे प्रकाशा बॅरेज तापी जलविद्युत व उपसा जलसिंचन योजना विभाग क्रमांक दोनचे कार्यालय आहे. तेथे चौकशी केली असता त्यांनीही आमचा संबंध नाही, अशी उत्तरे देण्यात आली. याबाबत पाटबंधारे विभागाचे धुळे येथील कार्यकारी अभियंता दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत मला माहिती नाही. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद का आहेत याची माहिती संबंधित विभागाला विचारतो. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असताना त्याबाबत रिपोर्ट का केला नाही याविषयी चौकशी करतो, असे सांगितले.शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या प्रकाशा बॅरेजच्या सुरक्षेविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालून या बॅरेजवरील सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.