शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रब्बी पिकांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील ...

जयनगर, धांद्रे, उभादगड, निंभोरे, कोंढावळ, कहाटूळ परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रानुसार शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री व आठ दिवस दिवसा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रपाळीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, थंडीमुळे रात्रभर उभे राहून पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. रात्रपाळीची वीज कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना हिंस्र प्राणी तसेच सरपटणार्‍या प्राण्यांपासूनही जीवितास धोका निर्माण झाला आहे. रात्री आठ दिवस वीज न देता कृषिपंपासाठी कायमस्वरूपी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत असतानाही रात्रपाळीचीच शिफ्ट चालू आहे.

रात्रपाळीत रात्री उशिरा वीज येत असल्यामुळे शेतकऱ्यांना सोबत बॅटरी आणि काठी घेऊन शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री पाणी भरत असताना डीपीवर तांत्रिक बिघाड झाल्यास त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. रात्री तांत्रिक बिघाड झाल्यास शेतकरी वायरमनलाही शेतात डीपी दुरुस्तीसाठी बोलवू शकत नाही किंवा स्वतःही डीपीवरील फ्यूज किंवा डिओ उडाला असल्यास अंधाऱ्या रात्रीत दुरुस्ती करू शकत नसल्यामुळे पिकांना पाणी न देता शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतातच करावा लागत आहे. रात्रीच्या शिफ्टमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, शेतीसाठी कायमस्वरूपी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.