शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

दहा दिवसांत दहा टक्क्यांनी वाढला पॅाझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ हळूहळू कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्यादेखील ३०० च्या घरातच राहत आहे. सुदैवाची ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ हळूहळू कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्यादेखील ३०० च्या घरातच राहत आहे. सुदैवाची बाब म्हणजे दहा दिवसांत रिकव्हरी रेट हा दहा टक्क्यांनी वाढला आहे. सध्या रिकव्हरी रेट हा ७६ टक्के असून, तो ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमालीचा उंचावला होता. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळू लागला आहे. त्यातही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने कोरोना संकटातही आशेचा किरण दिसू लागला आहे. येत्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासह रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

दहा टक्के वाढ...

जिल्ह्यात दहा दिवसांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. १५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या २८ हजार १८७ होती. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले होते. त्याची टक्केवारी ही ६६.०८ टक्क्यांपर्यंत होती, तर २५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ८६३ होती. त्यातील २५ हजार सात रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी ही ७६ टक्के इतकी आहे. अर्थात दहा दिवसांत पॅाझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांनी वाढला आहे.

वाढत्या सुविधांचा परिणाम

जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी वाढविण्यात आलेल्या सेवा व सुविधा पाहता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येत्या काळात आणखी बेडची संख्या आणि आरोग्य सेवा वाढविल्या जाणार असल्यामुळे कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

दर ९० टक्क्यांपर्यंत नेणार

जिल्ह्यात रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेली कडक संचारबंदी व त्यामुळे कोरोना साखळी तुटण्याचे प्रमाण पाहता ९० टक्के रिकव्हरी रेट साध्य करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रुग्णसंख्याही होतेय कमी

सध्या रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. १९ एप्रिल रोजी २८६ रुग्ण आढळून आले होते. २० रोजी २६५, २१ रोजी २५६, २२ रोजी २९३, २३ रोजी ४५९, २४ एप्रिल रोजी ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात चाचण्यांची संख्या वाढविली असल्यामुळे रुग्णसंख्यादेखील वाढत आहे.

अशी आहे आकडेवारी

१५ एप्रिल रोजी एकूण २८ हजार १८७ रुग्ण होते. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ६६.०८ टक्के होता.

२५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ही ३२ हजार ८६३ पर्यंत गेली. त्यातील २५ हजार सात रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ७६ टक्के इतका राहिला.

आतापर्यंत एकूण एक लाख पाच हजार ६९ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

सध्या ३२५ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.

जनरल क्वारंटाइन जवळपास चार हजार ५३५ इतके आहेत.