शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

मान्सूनपूर्व पावसाची नंदुरबारात दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:39 IST

156 मि.मी.पावसाची नोंद : सर्वाधिक धडगाव तालुक्यात, आंबा पिकाचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा/तळोदा/प्रतापपूर : जिल्हाभरात रविवारी पहाटे मान्सूनपूर्व पाऊस झाला. अवघ्या दोन ते तीन तासात जिल्ह्यात 156 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 69 मि.मी.पाऊस अक्कलकुवा तालुक्यात नोंदला गेला. दरम्यान, रविवारी देखील दुपार्पयत ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानाचा पारा घसरून 36 अंशावर आला होता. यामुळे नागरिकांना हायसे वाटले.शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडय़ाने नागरिक हैराण झाले होते. दुपारचे तापमान देखील नेहमीप्रमाणे 40 अंश नोंदले गेले होते. परंतु सायंकाळी सोसाटय़ाचा वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता निर्माण झाली. परंतु रात्री उशीरार्पयत पाऊस            आला नाही. शहादा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार भागात रात्री  साडेबारा वाजेनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सोसाटय़ाचा वारा आणि पाऊस            सुरू झाला. पावसाचा जोर अक्कलकुवा, तळोदा, धडगाव तालुक्यात सर्वाधिक होता. या भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागासह तालुक्यातील बहुतांश भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली. नंदुरबारचे रविवारचे तापमान 36 अंश नोंदले गेले. 24 तासाताच पारा घसरल्याने गेल्या महिनाभरापासून तापमान आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.शहादाशहादा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे.  गेल्या तीन महिन्यापासून कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यंदा 43 ते 45 र्पयत तापमान गेल्याने सर्वच जण हैराण झाले होते. शनिवारी रात्री          साडेअकरा वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.  शहरातील प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे तलावसदृश्य डबके साचले होते. शासकीय विश्रामगृह, भाजी मार्केट परिसर, सप्तशृंगी मंदिराजवळील पाटदेखील ओसंडून वाहत होता.      बसस्थानक आवारातही मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. प्रवाशांना पाण्याच्या डबक्यातून मार्ग काढत बस पकडावी लागत होती. बसस्थानक आवारात लावलेला जाहिरातीचा फलक कोसळला. दरम्यान, सातपुडय़ात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातील आदिवासी शेतक:यांनी रविवारी सकाळीच बियाणे खरेदीसाठी शहरात हजेरी लावल्याने दुकानांवर गर्दी दिसून आली.तळोद्यात वीजपुरवठा खंडिततळोदा येथेही शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नागरिकांनी झोपेतून उठून पावसाचे स्वागत केले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. शहरातील विविध भागात पाणी साचले होते. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या            समस्येत भर पडली. सकाळर्पयत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले. प्रतापपूर परिसरप्रतापपूरसह परिसरात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतक:यांच्या शेतातील चारा व केळीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून, कापूस लागवडीसह केळी, ऊस आदी पिकांना पाणी मिळाल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रविवारी पहाटे पाच वाजेर्पयत चाललेल्या पावसामुळे शेतात पडून असलेला भुईमूगाचा पाला व मक्याचा कडब्याचे नुकसान झाले आहे. या वेळी पावसाबरोबरच जोरदार वारा वाहू लागल्याने शेतात उभ्या असलेल्या केळी पिकाचे नुकसान झाले. शनिवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा  रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.या पावसामुळे लागवड करण्यात आलेल्या संकरीत कापूस, ऊस व केळी पिकास पाणी मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.