शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

पोलिसांच्या ‘मुस्कान’ने फुलविले अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे ‘हास्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:36 IST

नंदुरबार :  ‘मुस्कान’ने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अनेक कुटुंबाच्या आनंदात आनंदाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ही मोहिम ३१ ...

नंदुरबार :  ‘मुस्कान’ने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अनेक कुटुंबाच्या आनंदात आनंदाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ही मोहिम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ‘मुस्कान’साठी नेमलेल्या पथकांनी तब्बल २४१ बालकांना कुटूंबाकडे किंवा बाल सुधारगृहात पाठिवले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकुण आठ मोहिमा राबविण्यात आल्या असून सद्या नववी मोहिम सुरू आहे. ही मोहिम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अनेक बालके वाईट मार्गाला लागण्यापासून या मोहिमेमुळे वाचली आहेत. सद्या परत आलेली मुले कुटूंबांत आनंदाने राहत आहे. जिल्हा पोलिसांनी केवळ मुस्कान मोहिमेतच नाही तर इतर वेळी देखील हरविलेली, बेपत्ता किंवा वाट चुकलेल्या मुलांना घरी पोहचवले आहे. या मोहिमेच्या यशात पोलीस दलाच्या सर्व घटकांचा सहभाग आहे. 

भिक मागणारा बालकविसरवाडी बसस्थानकात एक चार वर्षीय बालक भिक मागत असल्याची माहिती मुस्कानच्या पथकाला मिळाली. पथकातील सदस्यांनी या बालकाला जवळ घेतले. परंतु पोलीस पाहून तो घाबरला. त्याला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्याने त्याचा पत्ता रा.पालेज, ता.राजानगर, जि.भरूच असे सांगितले. त्यामुळे पथकाने त्या भागात त्याचा शोध घेतला तेथे त्याचे पालक सापडले. त्यानंतर त्या बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दोन्ही बहिणी सुधारगृहातनवापुरात दोन अल्पवयीन मुली भिक मागत फिरत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्या बालिकांना शोधले. त्यातील एक १३ तर दुसरी पाच वर्षांची आहे. त्यांना पथकातील महिला कर्मचा-यांनी मायेने चौकशी केली असता त्यांनी आई पळून गेली तर वडिल मुंबई येथे काम करीत असल्याचे सांगितले. पत्ता मात्र सांगू शकल्या नाही. त्यामुळे या बालिकांना नंदुरबारातील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले. 

प्रेम प्रकरणातील बालिकानंदुरबार तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेस तिच्या प्रियकर पळवून घेऊन गेला होता. त्यांचा मोबाईलवरून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुलीची समजूत काढून तिला सर्व कायदेशीर बाबी समजवून सांगितल्या. त्यानंतर अल्पवयीन मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले. परंतु आईने ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पथकापुढे पेच निर्माण झाला. पथकाने बालसुधारगृहात दाखल केेले. 

मुस्कान मोहिमेअंतर्गत अनेक बालकांना त्यांच्या कुटूंबात पोहचविण्यात यश मिळाले. हरविलेले, घरून निघून गेलेली बालके जेंव्हा कुटूंबात पोहचतात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून काम आणि मेहनत केल्याचे सार्थ झाल्याचे वाटते. मोहिमेत २०११ च्या मिसिंगचीही उकल केली आहे. पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे या मोहिमा आणखी व्यापकपणे राबविण्याचे नियोजन आहे.- विजयसिंह राजपूत, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखा.