शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कोणीतरी आम्हाला गावी पोहोचते करा हो़ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, आम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी आर्त हाक देणारे परप्रांतीय मजूर सध्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नजरेस पडत आहेत़ गुजरातमधील बारडोली, राजकोट येथे काम करणारे परप्रांतीय मजूर गुरुवारी पायपीट करत विसरवाडी ता़ नवापुर येथे आल्यानंतर त्यांनी त्यांची आपबिती सांगितली़कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू झाल्याने लागलीच सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. बस, रेल्वेसह खाजगी वाहनेही बंद झाल्याने हजारोप परप्रांतीय मजूर गुजरात राज्यातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला कामही आणि डोक्यावर छतही नसल्याने त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेत गावाकडे धाव घेतली आहे़ अत्यंक बिकट अवस्थेत सापडलेले काही युवक सध्या पायपीट करत छत्तीसगढकडे आपआपल्या गावाकडे निघाले आहेत़ गुजरातमधील बारडोली व राजकोट येथून ते मार्गस्थ झाले आहेत़गेल्या चार दिवसांपासून निघालेले हे मजूर गुरुवारी रात्री विसरवाडी येथे पोहोचले होते़ कोणतेही वाहन नसल्याने पायी चालत ते गावाकडे निघाले आहेत़ रस्त्यात एखादे वाहन भेटल्यावर मग आर्जव-विनंत्या करुन ते वाहन जाईल तेथवर मजूर पोहोचत आहेत़ तेथून पुन्हा पायपीट करत निघायचे असा मार्ग त्यांनी धरला आहे़ भूक लागल्यावर रस्त्यात सर्व हॉटेल वगैरेही बंद असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपासून उपाशीच असल्याचे राजकोट येथे कामास असलेले व छत्तीसगड येथील रहिवासी रवी कौशिक व सुंदरकुमार कौशिक यांनी ‘लोकमत'शी बोलताना सांगितले.राजू बोरकर हे बारडोली येथे मिस्त्री काम करतात व सध्याच्या परिस्थितीत हाताला काम नसल्याने नागपूरला त्यांच्या गावी ते निघाले आहे. रस्त्यात गुजरात पोलिसांनी हाकलून लावले. काही ठिकाणी मारही खावा लागला, असा प्रवास करत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आलो. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या व्यथा जाणून घेतल्या व आम्हाला मदत केली असे ते म्हणाले. तसेच नवापूरकडून दहिवेलपर्यंत जाणाऱ्या एका ट्रक चालकास विनंती केल्यावर त्यांना दहिवेलपर्यंत बसवण्यात आले.दरम्यान शुक्रवारीही काही मजूरांचे जत्थे विसरवाडीपर्यंत पायपीट करत आले होते़ यातील काही मजूर हे धुळे तर काही नंदुरबार जिल्ह्यातील होते़ येथून ते पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत़