शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

कोणीतरी आम्हाला गावी पोहोचते करा हो़ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : शासनाने पाहिजे ती चाचणी घ्यावी, हवी ती तपासणी करावी, परंतु आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, आम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी आर्त हाक देणारे परप्रांतीय मजूर सध्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नजरेस पडत आहेत़ गुजरातमधील बारडोली, राजकोट येथे काम करणारे परप्रांतीय मजूर गुरुवारी पायपीट करत विसरवाडी ता़ नवापुर येथे आल्यानंतर त्यांनी त्यांची आपबिती सांगितली़कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू झाल्याने लागलीच सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. बस, रेल्वेसह खाजगी वाहनेही बंद झाल्याने हजारोप परप्रांतीय मजूर गुजरात राज्यातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला कामही आणि डोक्यावर छतही नसल्याने त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेत गावाकडे धाव घेतली आहे़ अत्यंक बिकट अवस्थेत सापडलेले काही युवक सध्या पायपीट करत छत्तीसगढकडे आपआपल्या गावाकडे निघाले आहेत़ गुजरातमधील बारडोली व राजकोट येथून ते मार्गस्थ झाले आहेत़गेल्या चार दिवसांपासून निघालेले हे मजूर गुरुवारी रात्री विसरवाडी येथे पोहोचले होते़ कोणतेही वाहन नसल्याने पायी चालत ते गावाकडे निघाले आहेत़ रस्त्यात एखादे वाहन भेटल्यावर मग आर्जव-विनंत्या करुन ते वाहन जाईल तेथवर मजूर पोहोचत आहेत़ तेथून पुन्हा पायपीट करत निघायचे असा मार्ग त्यांनी धरला आहे़ भूक लागल्यावर रस्त्यात सर्व हॉटेल वगैरेही बंद असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपासून उपाशीच असल्याचे राजकोट येथे कामास असलेले व छत्तीसगड येथील रहिवासी रवी कौशिक व सुंदरकुमार कौशिक यांनी ‘लोकमत'शी बोलताना सांगितले.राजू बोरकर हे बारडोली येथे मिस्त्री काम करतात व सध्याच्या परिस्थितीत हाताला काम नसल्याने नागपूरला त्यांच्या गावी ते निघाले आहे. रस्त्यात गुजरात पोलिसांनी हाकलून लावले. काही ठिकाणी मारही खावा लागला, असा प्रवास करत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आलो. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या व्यथा जाणून घेतल्या व आम्हाला मदत केली असे ते म्हणाले. तसेच नवापूरकडून दहिवेलपर्यंत जाणाऱ्या एका ट्रक चालकास विनंती केल्यावर त्यांना दहिवेलपर्यंत बसवण्यात आले.दरम्यान शुक्रवारीही काही मजूरांचे जत्थे विसरवाडीपर्यंत पायपीट करत आले होते़ यातील काही मजूर हे धुळे तर काही नंदुरबार जिल्ह्यातील होते़ येथून ते पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत़