शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कृपा करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, एकत्र येऊन काम करा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी जिल्हा प्रशासनावर आरोप करीत आहेत. वास्तविक सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे कृपा करून गैरसमज पसरवू नका, लोकांमध्ये जनजागृती करा, अशी आर्त हाक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रात्री फेसबुक लाईव्हवरून केली.

जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट व आरोग्य संदर्भातील केलेल्या कामाचा बोलबाला राज्यातच नव्हे तर देशात होत असताना स्थानिक पातळीवर काही लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या विरोधात सातत्याने आरोप होत आहेत. विशेषत: एका संस्थेला दिलेल्या रेमडेसिविरबाबत सातत्याने चर्चा करून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला रेमडेसिविर कुठल्या नियमानुसार दिले त्याबाबतचे कागदपत्र त्यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केले. रेल्वे आयसोलेशन बोगी संदर्भातही झालेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र त्यांनी सादर केले. ते म्हणाले, मी या जिल्ह्यात अधिकारी म्हणून आलो आहे. काही दिवसांचा पाहुणा आहे. पण हा जिल्हा तुमचा आहे. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सर्वांनीच चांगले काम करावे अशी अपेक्षा आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने जे करायचे ते करीत आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी जे जे शक्य ते प्रशासन करीत आहे. हा जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाला असा आपला दावा नाही. पण तीन प्लांट सुरू झाले आहेत. इतरही सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. जे झाले ते आपण एकट्याने केले नाही. त्यासाठी सर्वांची साथ लाभली म्हणूनच ते शक्य झाले.

जिल्ह्यात आरोग्याच्या खूप काही सुविधा नसताना गेल्या वर्षभरात मोठे काम उभे झाले आहे. अर्थात त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. पण काहीजण हेतूत: वारंवार प्रशासनाविरोधात आरोप करीत आहेत. खरे तर ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही. लसीकरणाबाबत सर्वत्र उत्साह असतांना जिल्ह्यात मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.