शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कृपा करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, एकत्र येऊन काम करा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी जिल्हा प्रशासनावर आरोप करीत आहेत. वास्तविक सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे कृपा करून गैरसमज पसरवू नका, लोकांमध्ये जनजागृती करा, अशी आर्त हाक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रात्री फेसबुक लाईव्हवरून केली.

जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट व आरोग्य संदर्भातील केलेल्या कामाचा बोलबाला राज्यातच नव्हे तर देशात होत असताना स्थानिक पातळीवर काही लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या विरोधात सातत्याने आरोप होत आहेत. विशेषत: एका संस्थेला दिलेल्या रेमडेसिविरबाबत सातत्याने चर्चा करून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला रेमडेसिविर कुठल्या नियमानुसार दिले त्याबाबतचे कागदपत्र त्यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केले. रेल्वे आयसोलेशन बोगी संदर्भातही झालेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र त्यांनी सादर केले. ते म्हणाले, मी या जिल्ह्यात अधिकारी म्हणून आलो आहे. काही दिवसांचा पाहुणा आहे. पण हा जिल्हा तुमचा आहे. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सर्वांनीच चांगले काम करावे अशी अपेक्षा आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने जे करायचे ते करीत आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी जे जे शक्य ते प्रशासन करीत आहे. हा जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाला असा आपला दावा नाही. पण तीन प्लांट सुरू झाले आहेत. इतरही सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. जे झाले ते आपण एकट्याने केले नाही. त्यासाठी सर्वांची साथ लाभली म्हणूनच ते शक्य झाले.

जिल्ह्यात आरोग्याच्या खूप काही सुविधा नसताना गेल्या वर्षभरात मोठे काम उभे झाले आहे. अर्थात त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. पण काहीजण हेतूत: वारंवार प्रशासनाविरोधात आरोप करीत आहेत. खरे तर ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही. लसीकरणाबाबत सर्वत्र उत्साह असतांना जिल्ह्यात मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.