यावेळी शहादा येथील वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानचे ॲड. गोविंद पाटील, गुरुचरणसिंग राजपाल, कचरूलाल जैन, प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी, अजय शर्मा, किशोर निकम, पिनाकिन पटेल, किशोर पाटील, सावता फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र माळी, उपाध्यक्ष प्रताप माळी, ग्रामस्थ नवल वाघ, महेश कुलकर्णी, राज माळी, विद्याधर सोनवणे, शरद पाटील, राहुल अहिरराव, सदानंद वाघ आदी उपस्थित होते. अनरद गावातील तरुणांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लागवड केलेली रोपे वाढावी आणि त्याचे संरक्षण व्हावे यासाठी रोपांभोवती संरक्षण जाळी लावण्यात आली. कार्यक्रमासाठी राधेश्याम पाटील, रामेश्वर माळी, किशोर निकम, ज्ञानेश्वर माळी, सागर पाटील, अतुल पाटील, गोपाळ माळी, दिनेश पाटील आदींनी सहकार्य केले. अजय शर्मा यांनी वृक्षारोपणासंबंधी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. लागवड करण्यात आलेल्या रोपांच्या संरक्षणाची जबाबदारी सावता फाऊंडेशनने घेतली.
सावता फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST