राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक व समतादूत विभागप्रमुख यांच्या संकल्पनेतून राज्यात ५ जून ते २० जून कालावधीत कोरोना महामारीच्या काळा प्राणवायू ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेता वृक्षलागवड व संगोपनासाठी समतादूत वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक महेश महाले, अमोल शिरसाठ, समाधान साबळे, खंडू घोरबांड आदींच्या हस्ते आंबा, चिंच, जांभूळ आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. भविष्यात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे धनराज निळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अक्कलकुवा येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST