शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

जनजागृतीतून झाला विचार पक्का ग्रामपंचायतीत वाढला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क ...

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यातुलनेत तीन टक्के कमीच मतदान झाले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वर्षभरानंतर ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर प्रशासन अनेक बाबींपासून लांब होते. यातून कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घेण्यात आल्या. यातून मतदार जनजागृतीचा एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. यातून २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्वच तालुक्यात मतदानाची टक्केवारी ही ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता गेल्या काही वर्षातील जनजागृतीमुळेच हे शक्य झाल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा मतदार संघासाठी मतदान

धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. यातून नंदुरबार जिल्ह्याचे सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन अशा आठ तालुक्यातील १८ लाख ७० हजार ११७ मतदारांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. २०१९ या वर्षात सर्व आठ तालुक्यात ६८.३३ टक्के मतदान झाले होते. एकूण मतदारांच्या तुलनेत ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळीही प्रशासनाने जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता.

चार मतदारसंघात विभागणी

जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. यात शहादा - तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा - धडगाव आणि नवापूर यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ११ लाख मतदारांचा यात समावेश आहे. या मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सहभाग नोंदवल्याने ६५.५० टक्के मतदान झाले होते. या मतदानासाठीही प्रशासनाने वेळोवेळी उपक्रम राबवत, महिला मतदान केंद्र, विशेष शिबिरांचे आयोजन केले असल्याने ही टक्केवारी वाढली होती.

वर्षभर कोरोनाचा ताप तरीही घटत्या मतदानाला बसला चाप

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींत एकूण १ लाख ११ हजार २३६ मतदारांचा समावेश होता. यातील ८६ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ७७ टक्के मतदान झाल्यानंतर प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. वर्षभर कोरोनासाठी धावपळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही जनजागृती आणि परिश्रमाविनाच मतदानाची टक्केवारी ही ७०च्या पुढे गेल्याने येत्या काळातही जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे निर्धारित करण्यात आले आहे.