शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जनजागृतीतून झाला विचार पक्का ग्रामपंचायतीत वाढला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क ...

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यातुलनेत तीन टक्के कमीच मतदान झाले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वर्षभरानंतर ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर प्रशासन अनेक बाबींपासून लांब होते. यातून कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घेण्यात आल्या. यातून मतदार जनजागृतीचा एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. यातून २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्वच तालुक्यात मतदानाची टक्केवारी ही ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता गेल्या काही वर्षातील जनजागृतीमुळेच हे शक्य झाल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा मतदार संघासाठी मतदान

धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. यातून नंदुरबार जिल्ह्याचे सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन अशा आठ तालुक्यातील १८ लाख ७० हजार ११७ मतदारांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. २०१९ या वर्षात सर्व आठ तालुक्यात ६८.३३ टक्के मतदान झाले होते. एकूण मतदारांच्या तुलनेत ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळीही प्रशासनाने जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता.

चार मतदारसंघात विभागणी

जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. यात शहादा - तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा - धडगाव आणि नवापूर यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ११ लाख मतदारांचा यात समावेश आहे. या मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सहभाग नोंदवल्याने ६५.५० टक्के मतदान झाले होते. या मतदानासाठीही प्रशासनाने वेळोवेळी उपक्रम राबवत, महिला मतदान केंद्र, विशेष शिबिरांचे आयोजन केले असल्याने ही टक्केवारी वाढली होती.

वर्षभर कोरोनाचा ताप तरीही घटत्या मतदानाला बसला चाप

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींत एकूण १ लाख ११ हजार २३६ मतदारांचा समावेश होता. यातील ८६ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ७७ टक्के मतदान झाल्यानंतर प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. वर्षभर कोरोनासाठी धावपळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही जनजागृती आणि परिश्रमाविनाच मतदानाची टक्केवारी ही ७०च्या पुढे गेल्याने येत्या काळातही जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे निर्धारित करण्यात आले आहे.