शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

आई-बाबा.., स्वत:साठी व आमच्यासाठीही मास्क वापरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

नंदुरबार : कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. जेमतेम शाळा सुरू झाल्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, त्यांचे शाळेत मन रमू ...

नंदुरबार : कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. जेमतेम शाळा सुरू झाल्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली, त्यांचे शाळेत मन रमू लागले तोच प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकही चिंतेत सापडले आहेत. दुसरीकडे मुलंही आपल्या पालकांची काळजी घेतांना दिसून येत आहेत. बाहेर जातांना किंवा बाहेरून आल्यावर विविध सूचना पालकांना त्यांच्याकडून ऐकाव्या लागत असतात. यासंदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना पत्र पाठवून याबाबत जागृती केली आहे.

कोरोनाने होरपळलेल्या जनतेला गेल्या चार ते पाच महिन्यात बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. शाळाही सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी रमू लागले आहेत. अशात आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी घरातील मुलं आपल्या आई-बाबांना बाहेर जातांना व बाहेरून आल्यावर घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत आणि होणारी काळजी याबाबत सूचना देत असतात. त्यात मास्क घेतला का? सॅनिटायझरची बाटली खिशात आहे का? सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळा, घरात आल्यावर आधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, नंतर गरम पाण्याने हातपाय धुवा अशा सूचना केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही जागृती येत आहे.

स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!

n प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, तसेच आई, वडील, भाऊ-बहीण, शेजारी यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा, त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

n आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जातांना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का? हे देखील पहा. असा सल्ला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

कोट...

प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर निघतांना मास्कचा आवश्यक वापर करावा. कुठेही विनाकारण हात लावू नका. सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करा. आपण काळजी घेतली तर आपले कुटुंब सुरक्षित राहील. किमान आपल्या कुटुंबासाठी तरी कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले आहेच. आपल्या एका चुकीमुळे घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकेल, अशी कृती करणे टाळा आणि नियम पाळा.

-डॅा.के.डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.

कोरोनाबाबत आम्ही शाळेत काळजी घेतोच. शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करतो. आमच्या आई-बाबांनीही घराबाहेर पडतांना आवश्यक काळजी घेतली तर कोरोनाला आपण लांब ठेवू शकतो. त्यासाठी मी दररोज बाबांना सांगत असते.

-आर्या पाटील, विद्यार्थिनी.

बाबा दररोज ॲाफिसला जातांना मास्क व सॅनिटायझर सोबत नेतात. काही वेळा घाईत त्यांना आठवण राहिली नाही तर मी किंवा आई त्यांना आठवण करून देतो. आम्हाला आमच्या बाबांची व बाबांना आमची काळजी असल्याने आम्ही दक्ष आहोत.

-पालवी जाधव, विद्यार्थिनी.

आमच्या कुटुंबाने सुरुवातीपासून कोरोनाला हरविण्याचा संकल्प केला आहे. आताही आम्ही काळजी घेत आहोत. आरोग्यमंत्र्यांचे आलेले पत्र फारच महत्त्वाचे आहे. प्रत्ोकाने काळजी घेतली तर कोरोना आपल्यापर्यंत कधीही येऊ शकणार नाही.

-नेहा पटेल, विद्यार्थिनी.

शाळा सुरू झाल्यापासून मी नियमित शाळेत जात आहे. शिक्षकांच्या आणि पालकांच्या सूचनांचे पालन केले जात आहे. घरातही आवश्यक ती काळजी घेतोच. बाबा बाहेर जातांना नियमित मास्क घालून जातात. कॉलनीतील इतरांनाही मी तसे सांगत असतो.

-निखिल सोनवणे, विद्यार्थी.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालूनच बाहेर पडावे. आम्ही शाळेत देखील प्रत्येकजण मास्क घालतो. वर्गात जवळजवळ बसत नाही, किंवा पटांगणात देखील जास्त एकमेकांच्या जवळ जात नाहीत. कुठल्याही वस्तूला हात लावत नाहीत.

-प्रितेश सावंत, विद्यार्थी.