शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

आरटीईअंतर्गत विद्यार्थ्याची निवड होवून पालक टाळताहेत शाळांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरटीईअंतर्गत गरजू यंदा ४५ खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीईअंतर्गत गरजू यंदा ४५ खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे़ यांतर्गत गटशिक्षणाधिकारी स्तरावर विद्यार्थी निवड झाली असली तरी १४७ विद्यार्थ्यांचे पालक मात्र शाळांच्या भेटीलाच गेलेले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे़कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्षाला खीळ बसली आहे़ तब्बल पाच महिन्यांपासून विद्यार्थी घरीच बसून आहेत़ शासन शाळा सुरू करण्यापेक्षा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देत आहे़ यात शिक्षणाचा अधिकारांतर्गत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ नंदुरबार जिल्ह्यात या प्रक्रियेत ४५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे़ प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ एकूण ४४२ जागांसाठी आलेल्या अर्जांमध्ये ४१२ मुलांची नावे अंतीम करण्यात आली आहेत़ सर्व सहा तालुक्यात पूर्ण केलेल्या प्रक्रियेंतर्गत २११ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ मात्र १४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम होवूनही त्यांच्या पालकांनी शाळांना अद्याप संपर्क केलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे़ ही प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आहे़ येत्या काही दिवसात शाळांकडून या विद्यार्थ्यांना रितसर अंतीम प्रवेश देवून त्यांच्या नावांची निश्चिती करण्यात येणार आहे़ परंतू पालकच आलेले नसल्याने पुढे काय, याचे उत्तर मात्र मिळालेले नाही़ प्राथमिक शिक्षण विभागाकडून उर्वरित ३० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी राज्य शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांकडून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत निर्णय होत नसल्याने आरटीई प्रक्रियेत समाविष्ट होवूनही पालकांनी अनुत्साह दाखवल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे़