शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी पालकांंचे योगदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली ...

नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नाही, तसेच पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखणे शक्य आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

त्या माध्यमातून मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी काळजी घेेणे महत्त्वाचे आहे.

घाबरून जाऊ नका; पण दुर्लक्षही करू नका

लहान मुलांमध्ये लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. अशा वेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. मोठ्यांनी एसएमएस या त्रिसूत्रीचा वापर केला तर लहान मुले सुरक्षित राहतील. कोरोनाकाळात मुलांना घरातच ठेवा. चाैरस आहारावर भर द्या. तिसरी लाट बालकांवर अटॅक करील याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे घाबरून न जाता कोरोनाला दूर ठेवा.

-डॉ.जयंत शहा, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार

फ्ल्यूची लस टोचून घ्या...

लहान बालकांना कोरोनाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही प्रत्येक पालकाने बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सकस आहार, योगा, प्राणायाम यांना प्राधान्य द्यावे. पावसाळा सुरू होणार असल्याने त्यात व्हायरल इन्फेक्शन बालकांना लागलीच होतात. त्यामुळे फ्ल्यूची लस टोचून घ्यावी. पालकांची भूमिका यात सर्वांत महत्त्वाची राहणार आहे.

-डॉ. युवराज पाटील, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार.

बालकांना कोरोनाविषाणू संक्रमणापासून वाचविणेच नव्हे, तर मोबाइलच्या वापर यास पर्याय निर्माण करून बालकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील यासाठी प्रत्येक पालकाने विशेष खबरदारी बाळगावी, ही काळाची गरज आहे. सध्या एक ते अठरा या वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाबाबत कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही. -डॉ. मालविका कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ, शहादा.