शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी पालकांंचे योगदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली ...

नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नाही, तसेच पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखणे शक्य आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

त्या माध्यमातून मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी काळजी घेेणे महत्त्वाचे आहे.

घाबरून जाऊ नका; पण दुर्लक्षही करू नका

लहान मुलांमध्ये लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. अशा वेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. मोठ्यांनी एसएमएस या त्रिसूत्रीचा वापर केला तर लहान मुले सुरक्षित राहतील. कोरोनाकाळात मुलांना घरातच ठेवा. चाैरस आहारावर भर द्या. तिसरी लाट बालकांवर अटॅक करील याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे घाबरून न जाता कोरोनाला दूर ठेवा.

-डॉ.जयंत शहा, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार

फ्ल्यूची लस टोचून घ्या...

लहान बालकांना कोरोनाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही प्रत्येक पालकाने बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सकस आहार, योगा, प्राणायाम यांना प्राधान्य द्यावे. पावसाळा सुरू होणार असल्याने त्यात व्हायरल इन्फेक्शन बालकांना लागलीच होतात. त्यामुळे फ्ल्यूची लस टोचून घ्यावी. पालकांची भूमिका यात सर्वांत महत्त्वाची राहणार आहे.

-डॉ. युवराज पाटील, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार.

बालकांना कोरोनाविषाणू संक्रमणापासून वाचविणेच नव्हे, तर मोबाइलच्या वापर यास पर्याय निर्माण करून बालकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील यासाठी प्रत्येक पालकाने विशेष खबरदारी बाळगावी, ही काळाची गरज आहे. सध्या एक ते अठरा या वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाबाबत कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही. -डॉ. मालविका कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ, शहादा.